आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:संताच्या सहवासाची आवड‎ लावून घ्या : रवींद्र महाराज‎

अकोट‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म घेणाऱ्याचा मृत्यू काेणीही टाळू शकत‎ नाही. मृत्यू हा शाश्वत आहे. नरदेह हा‎ नाशवंत आहे. काळाच्या ओघात आयुष्य‎ केव्हा संपते ते कळतही नाही. हा नरदेह वाया ‎ ‎जाऊ नये म्हणून सावध होऊन याचा‎ क्षणोक्षणी विचार करा. संतांच्या सहवासाची ‎ ‎ आवड लावून घ्या आणि तातडीने परमार्थ‎ साधा. शेवटी परमार्थ हा भवसागर पार करू ‎ ‎ शकतो, असा उद्बोधक विचार श्री संत‎ वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव‎ रवींद्र महाराज वानखडे यांनी मांडले.‎

विदर्भाचे देहू म्हणून प्रख्यात असलेल्या‎ श्री क्षेत्र कालवाडी येथील संत श्री तुकाराम‎ बीज उत्सवात कीर्तनमालेचे तिसरे पुष्प‎ गुंफताना रवींद्र महाराज बोलत होते.‎ क्षणोक्षणी हाचि करावा विचार। तरावया पार‎ भवसिंधू।। या अभंगाचा भावार्थ प्रकट‎ करताना प्रमाण व दृष्टांत सांगत उपस्थित‎ भाविक श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.‎ संतती, संगती, संपत्ती आणि प्रकृतीचा‎ विचार झालाच पाहिजे. त्याशिवाय चांगला‎ संसार होणार नाही.

या संसारातून अलगद‎ बाजूला होऊन संत संगत करावी. मात्र‎ डोळ्यात धूर भरून राहिल्याप्रमाणे‎ इहलोकीचे व्यवहार करू नका. जीवन‎ क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे. या क्षणी‎ आपण जिवंत आहोत पुढच्या क्षणी असूच‎ याची खात्री देता येत नाही. या‎ अनिश्चिततेचा अनुभव आपल्याला‎ जीवनात वारंवार येत असतो. या अनुभवातून‎ मनुष्याने संत सहवासाची आवड लावून‎ घ्यावी आणि तातडीने परमार्थ साधल्यास‎ आपली नाव भवसिंधू पार तरुण जाईल.‎ कालवाडी येथे गुरुवर्य महाराजांचा‎ कृपाप्रसाद लाभला. त्याचे पदस्पर्शाने ही भूमी‎ पुनीत झाली आहे. या भूमीतूनच अकोटचे‎ श्रद्धासागर क्षेत्र निर्माण झाले. वै.‎ पंजाबरावांची परमार्थिक सेवा मोठी आहे,‎ असे सांगून भाऊंच्या पावन स्मृतीला उजाळा‎ दिला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संतोष‎ शेषराव हिंगणकर यांनी कीर्तनकार रवींद्र‎ महाराजांचा यथोचित सत्कार केला.‎

बातम्या आणखी आहेत...