आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकाेला पातूर राेडवरील म्हैसपूर येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण, श्रीमद भागवत कथा यज्ञाच्या ठिकाणी, वाशीम बायपासपासून कथा स्थळी पाेहाेचण्यापर्यंत अनेक सुविधांचा अभाव असल्याचे शनिवारी दिसले.
भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वांना कथा श्रवण करणे साेयीचे जावे, या अनुषंगाने मंडप टाकणे आवश्यक हाेते. मात्र अनेकांना उन्हात उभे राहूनच कथा श्रवण करावी लागली. परिणामी पंडित प्रदीप मिश्रा यांनाच आयाेजकांना मंडप टाकण्याची सूचना करावी लागली.
नक्की प्रकरण काय?
म्हैसपूर येथे पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेला शुक्रवारी ५ मे राेजी प्रारंभ झाला. ४० एकर जागेवर मुख्य कथामंडप उभारला आहे. मुख्य कथा मंडपाच्या थाेड्याअंतरावर भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र भक्तांना सुविधा नसल्याने गैरसोय सहन करावी लागली. भक्त जमिनीवर अन् उन्हात तर पाेलिस सावलीत खुर्च्यांवर हाेते.
प्रकृती बिघडली; भाविकच धावले
कथा सुरू हाेण्यापूर्वी कथास्थळी निघालेल्या दाेन महिलांसाेबतच्या लहान मुलींना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला बसून पाणी देण्यात आले. कथा संपल्यानंतर घराकडे जात असलेल्या एका वृद्धाची प्रकृती बिघडली. या वृद्ध भाविकास अन्य भाविकांनी ओआरएस, लिंबू पाणी दिले. तेथून जात असलेल्या एका कारमध्ये बसून या वृद्ध भाविकास मार्गस्थ करण्यात अाले.
वाहतुकीचे तीन-तेरा
वाशीम बायपासकडून पातूर राेडकडे जाणारी जड वाहतूक बंद केली अाहे. मात्र कथा व्यवस्थापनेशी संबंध नसलेली (भाविकांसह) काही वाहने या मार्गावरून धावत हाेती. वाहतूकीच्या कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.