आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील किमान तापमान 10.6 अंशावर‎ ; हवेतील गारव्याचा जनजीवनावर परिणाम

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील किमान तापमानात सलग‎ दोन दिवसांपासून घसरण होत आहे.‎ गुरुवारी २.७ अंशाने तापमान घसरून‎ किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस‎ नोंदवले. तर शुक्रवारी त्यामध्ये‎ आणखी घट होऊन १०.६ अंश‎ सेल्सिअस किमान तापमानाची नोंद‎ झाली.‎ शुक्रवारी पहाटे वातावरणात‎ कमालीचा गारवा जाणवला. वाढत्या‎ गारव्याचा जनजीवनावर परिणाम‎ जाणवला. किमान तापमानात‎ सातत्याने चढ-उतार होत आहे.‎ आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात ढगाळ‎ वातावरण निर्माण झाले होते.‎ पावसाची शक्यताही व्यक्त केली‎ जात होती.

मात्र हे वातावरण‎ निवळल्यानंतर उकाडा, त्यानंतर तीन‎ दिवसांपासून आता सकाळ आणि‎ सायंकाळी हवेत गारवा राहत आहे.‎ ग्रामीण भागात रब्बी हंगामातील गहू‎ आणि हरभऱ्याच्या पिकाचे ओलीत‎ असल्याने शहराच्या तुलनेत अधिक‎ थंडी जाणवत आहे. त्यामुळे रात्री‎ पिकांना पाणी देणेही कठीण होत‎ आहे. अकोला शहरात शुक्रवारी‎ सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हवेत‎ कमालीचा गारवा होता. त्यामुळे‎ नागरिकांना स्वेटर आणि मफरलचा‎ आधार घ्यावा लागला. तर ग्रामीण‎ भागात दोन दिवसांपासून पुन्हा‎ शेकोट्या पेटायला लागल्या आहेत.‎ वाढत्या थंडीपासून‎ आबालवृद्धांची काळजी‎ घ्यावी, असे आवाहन‎ करण्यात आले आहे.‎

पिकांमध्ये धूर करा‎ जिल्ह्यात हवामान कोरडे व थंड असल्याने‎ हरबरा, संत्रा व भाजीपाला पिकांमध्ये थंडीचा‎ दुष्परिणाम रोखण्यासाठी पिकास वारंवार‎ हलके ओलीत करावे व थंडीपासून पिकांचा‎ बचाव करण्यासाठी पिकात सायंकाळ व रात्री‎ काडी कचऱ्याचा धूर करावा, असा सल्ला डाॅ.‎ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला‎ आहे. प्रामुख्याने फळबागांमध्ये वाळलेली‎ पाने, शेणाच्या गोवऱ्या किंवा काडी, कचरा‎ जाळून धूर केल्यास बागेतील तापमान‎ वाढण्यास मदत होते व पिकांचे संरक्षण होते.‎ मात्र जाळ किंवा शेकोट्या करताना झाडांचे‎ नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेणे‎ आवश्यक आहे

बातम्या आणखी आहेत...