आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत:आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचा नवा पक्ष उभा राहील‎, आंबेडकरी जलसाकार शाहीर संभाजी भगत यांचे भाष्य‎

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसा गाताना मला जी उर्जा मिळते, ती आमच्या ‎ ‎ बहुजन समाजाच्या बहिणींकडून मिळते.‎ आंबेडकरी चळवळीत ज्या महिला दुर्लक्षित‎ आहेत, त्यांचा पाच ते दहा वर्षात एक नवा पक्ष उभा ‎ ‎ राहील. तो पक्ष समाजाचे नेतृत्व करणारा असेल‎ आणि बहुजन समाज त्याला जोडेल. त्यांना भीती ‎ ‎ वाटणार नाही. ते युगायुगाचे साचलेले असल्याने‎ माेठे रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही,’ असे ‎ ‎ भाष्य आंबेडकरी जलसा म्हणून नावारूपास‎ आणणारे शाहीर संभाजी भगत यांनी केले.

‘ दिव्य‎ मराठी’ कार्यालयात सदिच्छा भेटी दरम्यान ते‎ बोलत होते.‎ सामाजिक, राजकीय व धार्मिक विषयांवर‎ शाहीर संभाजी भगत यांनी परखड मत मांडले. ते‎ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर हे स्त्रीसत्ताक होते.‎ ‎ ‎महाराष्ट्रातील जनतेच्या नसानसांमध्ये हे दाेन‎ महापुरुष आहेत. कितीही नाकारले तरी ते पेरलेल्या‎ बीजसारखे उगवणारचं.

डाॅ. आंबेडकरांनी धर्म‎ स्वीकारला म्हणजे कुण्या धर्माचा तोटा केला, असे‎ नाही, कारण जे कधी धर्मात नव्हते ते‎ गावकुसाबाहेरच होते त्यांनीच डाॅ. बाबासाहेबांचा‎ धर्म स्वीकारला. म्हणजे एक प्रकारे बाहेरचा माणूस‎ बाहेर गेला म्हणून कुण्या धर्माचा तोटा कसा काय‎ ‎ होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.‎

परिस्थितीत घडलेले नेते आणि परिस्थितीने‎ घडवलेले नेते असे दोन प्रकार आहेत. डाॅ.‎ बाबासाहेबांनी परिस्थिती घडवली आहे.‎ आंबेडकरी राजकीय पक्षामध्ये केडर नाही.‎ आमच्यात खूप चुका आहेत, आम्ही ट्रेनिंग देत‎ नाही, त्यासाठी लाँगटर्म काम करावं लागेल,‎ असेही भगत म्हणाले.‎

जलसाचे सादरीकरण करताना इतका जोश कसा येतो, यावर संभाजी भगत‎ ‎ म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांच्या काळात जलसा होता. मधल्या काळात‎ ‎ कव्वाल्यासारखे प्रकार आले आणि जलसा मागे पडला. मी त्याच जलशाचे‎ ‎ पुनरूज्जीवन केले आहे.

आज, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब‎ ‎ असते तर ते काय म्हणाले असते, त्यांनी काय विचार केला असता, हेच‎ ‎ जलसातून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. मी कंठाने कधी गात नाही, गाणं‎ तत्त्वज्ञानाच्या पाेटातून गातो, ही तत्वज्ञानाची, विचारधारेची ताकद आहे, असेही ते म्हणाले.‎