आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आर्थिक दुर्बल योजने अंतर्गत मिळालेल्या घरकुलांचा एक वर्षापासून पाचवा हप्ता थकल्याने उसनवारीवर घरकुलाचे काम पूर्ण करणारे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पाचवा हप्ता द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा या लाभार्थींनी मोर्चा काढत नगरपंचायतीला निवेदनातून दिला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील शहरातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. लाभार्थींनी जुनी घरे पाडून नवीन घरकुल बांधले . चार हप्तेही मिळाले. मात्र शेवटचा आणि पाचवा हप्ता एक वर्षापासून थकला आहे.
तरी कर्जबाजारी होत लाभार्थींनी घरकुल बांधकाम पूर्ण केले. पाचवा हप्ता मिळण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. परंतु म्हाडाकडे नगरपंचायत प्रशासनाने पाठपुरावा न केल्याने शहरातील घरकुलाचे ४० लाभार्थी पाचवा हप्ता मिळण्यापासून वंचित राहिले आहे. त्रस्त लाभार्थींनी दि. १० एप्रिलला मूकमोर्चा काढत नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की, मुख्याधिकारी अभिजित वायकोष यांना निवेदन दिले. निवेदनावर ४० लाभार्थींच्या सह्या आहेत.मोर्चाचे नेतृत्व नगरसेवक वैभव पवार यांनी केले.आ. संजीव रेड्डी बोदकुरवर यांचे माध्यमातून म्हाडा मध्ये आपण पाठपुरावा करू अशी माहिती पवार यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.