आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:‘शासकीय योजनांमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक’ ‎

मूर्तिजापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या‎ शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत‎ पोहोचवणे गरजेचे आहे. शासकीय‎ योजनांमध्ये जनतेचा सहभाग आणि‎ त्यांना सहभागी करून घेणे हे‎ महत्त्वाचे आहे. महसूल प्रशासन‎ अधिक लोकाभिमुख कार्यक्षम,‎ गतिमान व पारदर्शक करण्याकरिता‎ तसेच सर्वसामान्य जनता यांचे‎ महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय‎ कार्यालयाशी संबंधित दैनंदिन‎ कार्यातून गतिमान शासन अशी‎ मानसिकता ठेवून सकारात्मक पद्धतीने‎ कामकाज करण्यात यावे. शासन‎ आपल्या दारी या धर्तीवर महाराजस्व‎ अभियानाचे गाव पातळीवर लोकांची‎ तसेच शेतकऱ्यांची कामे गतिमान‎ पद्धतीने पूर्ण व्हावी, असे प्रतिपादन‎ जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी‎ केले.‎

येथील महसूल विभागाच्या वतीने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तहसील गोडाऊनमध्ये आयोजित‎ महाराजस्व अभियान कार्यक्रमाच्या‎ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.‎ अभियानाचे आयोजनांतर्गत विविध‎ विभागाच्या शासकीय योजनांची‎ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी,‎ हेच ध्येय अभियानाचे असून या‎ माध्यमातून राज्यातील प्रत्येक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्ह्यात व तालुक्यात महाराजस्व‎ अभियान शासन राबवित असल्याचे‎ त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे‎ उद्घाटक म्हणून उपविभागीय‎ अधिकारी अभयसिंग मोहिते उपस्थित‎ होते.

तहसीलदार प्रदीप पवार, तालुका‎ वैद्यकीय अधिकारी सुधीर कराड,‎ मुख्याधिकारी श्रीमती सुप्रिया‎ टवलारे,तालुका कृषी अधिकारी‎ अमृता काळे, जिल्हा परिषद बांधकाम‎ उपविभागाचे उपविभागीय अभियंता‎ उमाळे, गटविकास अधिकारी अशोक‎ बांगर, नायब तहसीलदार प्रदीप पांडे,‎ नायब तहसीलदार राठोड आदींची‎ प्रमुख उपस्थिती होती.‎

शासनाच्या विविध विभागाच्या‎ वतीने लावण्यात आलेल्या विविध‎ योजनांच्या २० स्टॉलवर प्रत्यक्ष जाऊन‎ त्याचे निरीक्षण करून जिल्हाधिकारी‎ नीमा अरोरा यांनी माहिती घेऊन,‎ विविध योजनातील लाभार्थ्यांना‎ प्रमाणपत्र व त्यांच्या योजनेचे पत्र‎ वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन नायब तहसीलदार‎ बनसोड यांनी केले .उपस्थितांचे‎ आभार तालुका पुरवठा निरीक्षक‎ चैताली यादव यांनी व्यक्त केले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता महसूल‎ विभागाचे श्रीकांत नागरे, अशोक‎ वाकोडे यासह कर्मचारी वृंदांनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...