आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष ‎:‘कॅच द रेन’ विषयावर पथनाट्यातून जनजागृती‎

मूर्तिजापूर‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंवर्धन ही काळाची गरज‎ असून, पाणी अडवणे, जिरवणे व‎ साठवणे यासंबंधी आता सर्वांनी‎ जागृत राहिले पाहिजे. पावसाचे पाणी‎ वाहून न जाता जास्तीत जास्त‎ प्रमाणात ते जमिनीत जिरवण्यात‎ यावे, अडवण्यात यावे आणि त्याची‎ साठवणूक करून ते वापरता यावे‎ याकरिता नेहरू युवा केंद्र, अकोला‎ व जिज्ञासा क्लासेस, मूर्तिजापूर‎ यांच्या संयुक्त विद्यमानाने ''''कॅच द‎ रेन'''' या विषयावर पोलीस स्टेशन‎ समोर शुक्रवार बाजारामध्ये, डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या‎ समोर बसस्थानक मूर्तिजापूर व‎ मूर्तिजापूर तहसील असे शहरातील‎ विविध ठिकाणी पथनाट्य सादर‎ करून नागरिकांमध्ये जनजागृती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आली.‎

जल संवर्धनासाठी //"रेन वॉटर‎ हार्वेस्टिंग'''' काळाची गरज आहे.‎ भविष्यासाठी आपण पाण्याचे साठे‎ कसे वाचवू शकतो, शोष‎ खड्ड्यांमध्ये पाणी कसे साठविले‎ जाते, छतावरून पडणारे पाणी व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ त्याचे नियोजन कसे करायचे, जल‎ संवर्धनावर शेतीला पाणी देण्यासाठी‎ शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करणे‎ गरजेचे आहे. शेतीला एका वेळेस‎ पाटातून पाणी दिले तर ते माती व‎ गाळ वाहून जाते. परंतु] पूर्ण ठिबक‎ सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तर शेतीला पाणी पूरक होते. माती व‎ गाळ वाहून जात नाही आणि शेती‎ खडकाळ होत नाही.‎ तसेच पावसाचे पाणी‎ वाचविण्यासाठी कोणत्या‎ उपाययोजना कराव्यात या उद्देशाने‎ पथनाट्य सादर करण्यात आले.‎

पथनाट्यमध्ये उपस्थित असलेले‎ कलाकार सिमा धम्मपाल ढिसाळे,‎ कोमल प्रमोद उईके, सुजाता रंगराव‎ तायडे, पूजा भावेश सदांशिव,‎ समीक्षा मधुकर राऊत, साक्षी संजय‎ गाडगे, गणेश गुलाबराव चौके,‎ सचिन राजू थाटे, मयुर विनोद‎ अलाटे, आकांक्षा संतोष गवई तसेच‎ बालकलाकार जिज्ञासा धम्मपाल‎ ढिसाळे या सर्व कलाकारांनी‎ उत्कृष्ट पथनाट्य सादर करून‎ प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचबरोबर‎ तालुका कोऑर्डिनेटर रिंकू अनिल‎ भटकर यांनी पथनाट्यामध्ये‎ पाण्याचे महत्व सांगितले. जल है तो‎ कल हैचे नारे देऊन पथनाट्याची‎ शोभा वाढवली. मूर्तिजापूर‎ शहरामध्ये शांततेत व उत्साहात‎ पथनाट्य सादर करून‎ नागरिकांमध्ये जनजागृती केली.‎

बातम्या आणखी आहेत...