आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मुलगी हीच अाई-वडिलांचे जीवन असून, मुलींनाे त्यांच्या मर्जीनेच लग्न करू अाणि अापल्याच पालकांना कन्यादान करण्याची संधी देऊ, असा संकल्प करा,’ असे अावाहन शिवमहापुराण महाकथेत मंगळवारी पंडित प्रदीप िमश्रा यांनी केले.
अविवाहित मुलींना कथामंडपात उभे राहण्यास सांगून त्यांनी तसा संकल्पही करून घेतला. अाई-वडिल मुलींना उच्च शिक्षण, सर्व सुविधा देतात. मात्र मुली शरीययष्टी, वाहने, भाैतिक सुख देणाऱ्या साहित्याकडे पाहून भाळून पळून जातात; परंतु त्यानंतर त्यांना पश्चात्ताप, दु: ख हाेते. मुली भरकटत असल्याने ‘द केरला स्टाेरी’सारख्या चित्रपटांची िनर्मिती करावी लागते.
प्रेम हे समर्पणाचे प्रतीक असून, प्यारचा शेवट खूनासारखा वाईट होतो, असेही ते म्हणाले. आचार, विचार, सत्कार व प्रेमाने जीवन श्रेष्ठ हाेते. सुदृृढ असतानाच कथा श्रवणासह साधना करा, असे म्हणत त्यांंनी अाराधनेचे महत्त्व िवषद केले. पाचवे पुष्प गुंफताना पं. प्रदीप मिश्रा यांनी चंचल डोळे व मनावर नियंत्रण ठेवावे, कर्म प्राधान्य, शुद्ध आणि सात्त्विक भावनेने कथा, सत्संग केल्यास देव, संत चरणांची मिळणारी रज, पैशाच्या लोभापायी तुटत चाललेली रक्ताची नाती, कौटुंबिक दुरावा, धर्म, देवालये, सत्संगांचा धंदा अशा वास्तवावर प्रहार केले.
चित्रपटांच्या काल्पनिक कथांमुळे भरकटत चाललेल्या मुलींची समजूत काढत त्यांनी कुटुंब, प्रेम, वात्सल्यपूर्ण भक्तीचे महत्त्व पटवून दिले. आदरातीथ्य कसे करावे, गरिबांकडून शिकावे. श्रीमंतांच्या विवाह, समारंभात तुम्हाला कोणी विचारत नाही. धन, संपत्ती, वैभवाने सत्कार, आदर मिळत नसून, त्यासाठी वाणीत गोडवा, वर्तनात नम्रता, समर्पित भावनेने प्रेम अशा गुणसंचयावर जीवन श्रेष्ठ बनते.
लालूच, तृष्णा, ईर्ष्या, क्रोध, आकस ठेवून सत्संग केल्यास दु:ख मिळेल, असे सांगून शरीर धुण्याने भगवंत मिळाला असता तर पाण्यातील मासाेळीला सर्वप्रथम देवाची प्राप्ती झाली असती. देव शरीर नव्हे, तर मन शुद्ध असलेल्या साधकाला मिळताे. विचार आणि दृष्टी यावरच जशास तसे व्यक्ती भेटतात. चेहरे, कपडे बदलण्यापेक्षा स्वतःचा व्यवहार, वर्तन बदला. लोकजवळ येतील असा सल्ला त्यांनी दिला.
परिश्रमानेच भाग्य बदलणार
श्रवण शक्ती प्रबळ बनवून मन, बुद्धी, हृदय एकाग्र ठेवून कथा ऐकताना ज्याचा अंगावर रोमांच , हास्य, डोळ्यात भावाश्रू दाटतात तो खरा संत होतो. काही जण देवाजवळ असूनही देवाचे होत नाहीत. भगवंतावरील विश्वास ढळू देऊ नका. िवश्वास श्रद्धेत परिर्वतीत करा. जल, वायू सह सर्व स्तरात शिव असल्याचे पं. प्रदीप मिश्रा यांनी स्पष्ट केले. परिश्रमाचे महत्त्व पटवून देताना भाग्य बदलण्यास दुसरे कोणी येणार नसून, घरात बसूनही ते बदलणार नाही. सातत्याने केलेल्या परिश्रमामतूनच परिवर्तन होईल, असे त्यांनी सांगितले.
देवालये नाहीत उत्पन्नाची साधने
दुसऱ्याने शिवी दिली तर प्रतिक्रिया न देता मौन धारण करून जप करा. तुमच्या अंत:रमनातील देव आपोआप उत्तर देईल. विंचू, सापापेक्षाही मनुष्य विषारी झाला अाहे. मनुष्य चावल्यास काेणता उपचार कराल, असा प्रश्न त्यांनी केला. कुटुंबातील सदस्यांत समर्पित भावनेने प्रेम असावे. धर्म, कथा, देवालये, सत्संग हे उत्पन्नाचे साधन नसल्याचेही पंडित मिश्रा यांनी स्पष्ट केले. मुलगी करते दाेन कुटुंबांचा उद्धार मुलीमुळे दाेन कुटुंबांचा उद्धार हाेताे. मुलगी पालकांचा गौरव, अभिमान असून, मुलीचे पिता हे भाग्यच नाही सौभाग्यशाली असतात. मुलीच्या पित्यालाच निवडणुकीत उमेदवारी तर मुली असलेल्या घरातच मुलींना द्या,असे आवाहन पं. प्रदीप मिश्रा यांनी केले.
अन् डाेळ्यात अाले भावाश्रू
कथेत पं. प्रदीप मिश्रा यांनी बाप-लेकीचे नाते कसे हळवे असते, लेकच बापाचे जीवन असते, हेही सांगितले. लेकीच्या लग्नातील भावूक क्षणाच्या वर्णानामुळे मुलींसह कथा मंडपातील अनेकांना गहिवरून अाले अाणि त्यांच्या डाेळ्यांच्या कडा भावाश्रुंमुळे अाेल्या झाल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.