आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:आरएसएस, भाजपने‎ फसवणूक थांबवावी

अकोला‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील मातंग समाजाचे अ, ब,‎ क, ड असे वर्गीकरण करून त्यांना‎ स्वतंत्र आरक्षण द्यावे, अन्यथा राष्ट्रीय‎ स्वयंसेवक संघ व भाजपने मातंग‎ समाजाची आजपर्यंत फसवणूक केली‎ असे जाहीर करावे, अशी मागणी मातंग‎ समाजाचे नेते गजानन तायडे व‎ गजानन दांडगे यांनी केली. ते‎ गुरुवारी शासकीय विश्रामगृहातील‎ पत्रकार परिषदेत बोलत होते.‎ पत्रकार परिषदेत दांडगे म्हणाले की,‎ आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने‎ मातंग समाजाला वैदिक हिंदुत्ववादी‎ विचारांनी जखडून ठेवले आहे.‎ त्यामुळे मातंग समाजाला अपेक्षित‎ आरक्षणाचा लाभ मिळाला नाही‎ आणि कायम राजकीयदृष्ट्या बेदखल‎ असून आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात‎ अनुसूचित जाती या प्रवर्गात असलेल्या‎ मातंग आणि त्यांच्या पोटजातीला‎ त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात‎ वर्गीकरण करून आरक्षण देण्यात यावे,‎ अशी मागणी हाेत अाहे. तसेच अ, ब,‎ क, ड असे वर्गीकरण करून त्यांच्या‎ लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण‎ देण्यात यावे अशी मागणी मातंग‎ समाजाची आहे.

मातंग समाज व‎ समाजातील नेते वंचित बहुजन‎ आघाडीसोबत राहतील याबाबत त्यांनी‎ जाहीर भूमिका स्पष्ट करावी, असे‎ आवाहन सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेत‎ मातंग समाजाचे नेते गजानन तायडे व‎ गजानन दांडगे यांनी मातंग समाजातील‎ प्रस्थापित नेत्यांना केले. पत्रकार‎ परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे‎ जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे,‎ लहुसेना अध्यक्ष गजानन तायडे,‎ महिला नेत्या सुनंदा चांदणे, उमाताई‎ अंभोरे, युवा आघाडी प्रसिद्धी प्रमुख‎ पवन गवई, नारायण मानवटकर,‎ गंगाधर सावळे, सुनील अवचार,‎ गोकुळ मानकर, भूपेंद्र अंभोरे,‎ अशोकराव गायकवाड, रवी तायडे,‎ हर्षल लोखंडे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...