आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत साेमवारी संपली. समित्यांमधील चार मतदारसंघांत एकूण १२९०५ मतदार असून, सहकार राजकारणात हे मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. १२६ जागांसाठी निवडणूक प्रक्रियात हाेत असून, सहकार राजकारण ढवळून निघत आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठीही प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२पासून सुरू हाेणार हाेती. मात्र निवडणुकांबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या हाेत्या. न्यालयाने अंतिरिम आदेश जारी केला. त्यानंतर राज्य सहकारी िनवडणूक प्राधिकारणाने बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम सुरू करण्यासाठी िजल्हा उपनिबंधकांना आदेश जारी केला.
या आदेशात काेणत्या कालावधीत काेणती प्रक्रिया राबवावी, हेही नमूद करण्यात आले. त्यानुसार उमेदारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ एप्रिल राेजी संपली. गुरुवारी हाेणार जाहीर उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिलला आिण वैध अर्ज ६ एप्रिल राेजी जाहीर हाेणार आहेत. उमेदवारी अर्ज २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी आिण िचन्हांचे िवतरण २१ एप्रिल राेजी हाेणार आहे. मतदान २८ एप्रिल राेजी हाेणार असून, मतमाेजणी मतदानाच्या तीन दिवसांच्या आत हाेणार आहे.
मूर्तिजापुरात १८ जागांसाठी ८२ अर्ज मूर्तिजापूर| कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून द्यावयाच्या १८ जागांसाठी ८२ उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. साेमवार ३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवशी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्यापूर्वी ३२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. निवडणुकीकरता सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११,ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागा, व्यापारी व अडते मतदारसंघातून २ , हमाल व मापारी मतदारसंघातून १ जागा अशा एकूण १८ जागांकरता मतदान होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.