आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात‎ वाय 20 -भारत वक्तृत्व स्पर्धा उत्साहात‎

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शंकरलाल खंडेलवाल‎ महाविद्यालयात केंद्र सरकारच्या युवा‎ आणि क्रीडा मंत्रालय, उच्च शिक्षण‎ विभाग महाराष्ट्र शासन, संत‎ गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या‎ संयुक्त सहकार्याने वाय २०-भारत‎ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात‎ आले होते.‎ स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक‎ मंडळ अकोलाच्या अध्यक्ष‎ डॉ.ताराताई हातवळणे यांच्या हस्ते‎ झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ गोपाल खंडेलवाल होते. या वेळी‎ प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ.‎ जगदीश साबू उपस्थित होते. या वेळी‎ व्यासपीठावर परीक्षक डॉ. शिवाजी‎ नागरे, डॉ. प्रसन्न पांडे, प्रा.शेखर‎ दीक्षित, प्रा. अदिती मानकर उपस्थित‎ होत्या. जागतिक स्तरावरील जी-२०‎ संघटनेच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या‎ युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत‎ वाय-२० स्थापन करून भारतातील‎ विविध संस्थांमध्ये १८ आंतरराष्ट्रीय‎ बैठका होत आहेत. या अनुषंगाने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये‎ एका महाविद्यालयाची निवड करून‎ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात‎ आलेले होते.

स्पर्धेकरिता भविष्यातील‎ कामकाज ४.० नवीनता व एकविसावे‎ शतकातील कौशल्य, हवामान बदल‎ आणि आपत्ती धोका कपात‎ टिकाऊपणा जगण्याचा एक मार्ग,‎ शांतता निर्माण आणि समेट युद्धरहित‎ नवीन युगात प्रवेश, शेअर सामायिक‎ भविष्य लोकशाही आणि शासनात‎ युवांचा सहभाग, स्वास्थ कल्याण‎ आणि खेळ युवकांसाठी आराखडा या‎ विषयावर रेणुका नाळे, अमन जैन,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रोहन गोडले, श्रुती म्हैसने, विनिता‎ मौर्या, श्वेता दीक्षित, ऋषा वसु, सार्थक‎ ठाकरे, वैष्णवी राठोड, आलोक‎ जयस्वाल,राधेश्याम राठोड, आनंद‎ सपकाळ या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त‎ सहभाग घेतला. यातील पाच‎ विद्यार्थ्यांची पुणे येथे राज्यस्तरावर‎ होणाऱ्या स्पर्धेकरीता निवड करण्यात‎ आली. स्पर्धेचे प्रास्ताविक स्वामी‎ विवेकानंद अभ्यास केंद्राच्या‎ समन्वयक डॉ. निशा वराडे यांनी केले.‎ या कार्यक्रमाला सर्व शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी‎ बहुसंख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...