आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेजना:नदी जोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला‎ मिळणार 282.34 दलघमी पाणी‎

अकोला‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
काटेपूर्णा नदी (संग्रहित छायाचित्र.)‎‎ - Divya Marathi
काटेपूर्णा नदी (संग्रहित छायाचित्र.)‎‎

राज्य शासनाच्या अर्थ संकल्पात‎ जिल्ह्याच्या पदरात फारसे काही‎ पडले नाही. मात्र वैनंगगा-न‌ळगंगा‎ नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू होणार‎ असल्याने जिल्ह्याला २८२.३४‎ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त‎ जलसाठा उपलब्ध होणार असून,‎ ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन‎ सिंचनाखाली येणार आहे.‎ या प्रकल्पामुळे एकीकडे पिण्याचे‎ पाणी तर दुसरीकडे सिंचनासाठी‎ पाणी उपलब्ध होणार असून,‎ खारपाणपट्ट्यातील पाणी समस्या‎ निकाली निघण्यास मदत होणार‎ आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास येण्यास‎ अनेक वर्ष लागणार असले तरी‎ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना‎ मोठा दिलासा मिळणार आहे.‎ पूर्व विदर्भात असलेल्या‎ वैनगंगेच्या खोऱ्यात ११७ अब्ज फूट‎ (टीएमसी) पाणी आहे. वैनगंगा‎ प्रकल्पामुळे ५७ टीएमसी (२८.३२‎ दशलक्ष घनमीटर म्हणजे एक‎ टीएमसी) पाणी अडवले गेले आहे.‎ उर्वरित ६० टीएमसी पाणी वाहून‎ जाते. हे सर्व लक्षात घेऊनच राष्ट्रीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जलविज्ञान प्राधिकरण (हैदराबाद)‎ यांनी २००९ ला सर्वेक्षण केले होते.‎ त्यावेळी या नदीजोड प्रकल्पासाठी ८‎ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित‎ होता. मात्र त्यावेळी सर्वेक्षणाच्या‎ पलीकडे या प्रकल्पाचे काम गेले‎ नाही.

मात्र नागपूर जलविकास‎ प्राधिकरणाने नव्याने सर्वेक्षण करुन‎ प्रकल्प अहवाल सादर केला.‎ वैनगंगा प्रकल्पातून सोडलेले पाणी‎ पारंपारिक कालव्या ऐवजी बंद‎ पाइपमधून ४२६ किलोमीटरचा प्रवास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करुन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा‎ नदीत आणले जाणार आहे.‎ नागपूर,वर्धा,अमरावती , अकोला‎ या चार जिल्ह्यांना मुबलक पाणी‎ उपलब्ध होणार आहे. तर सर्वाधिक‎ कमी पाणी यवतमाळ जिल्ह्याला‎ मिळणार आहे. मात्र प्रत्येक‎ जिल्ह्यासाठी नदी जोड प्रकल्प‎ उपयुक्त ठरणार असला तरी‎ अकोला जिल्ह्यासाठी मात्र हा‎ प्रकल्प वरदान ठरणार आहे.

या‎ प्रकल्पासाठी ७२ हजार कोटी रुपये‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खर्च केले जाणार आहेत. तसेच‎ ७५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीही‎ केली जाणार आहे.‎ जिल्ह्यात निम्न काटेपूर्णा,‎ येळवण, सीसा उदेगाव, चिखलगाव‎ या ठिकाणी जल प्रकल्प बांधण्यात‎ येणार असून, काटेपूर्णा प्रकल्पात‎ पूनर्भरण केले जाणार आहे. यामुळे‎ जिल्ह्यात २८२.३४ दशलक्ष घनमीटर‎ अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार‎ असून, ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन‎ सिंचनाखाली येणार आहे.‎

खारपाणपट्ट्याला‎ होईल फायदा‎
अकोला-अमरावती-बुलडाण्यात‎ पूर्व-पश्चिम १०० ते १५० कि.मी. उत्तर ते‎ दक्षिण १० ते ६० कि..मी. खारपाणपट्टा‎ आहे. जिल्ह्यातील ७७५ गावे त्यात‎ आहेत. १ लाख ९४ हजार हेक्टर जमीन‎ त्यात येते. येथील पाणी पिण्यास‎ वापरता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात‎ अतिरिक्त जलसाठा उपलब्ध‎ झाल्यानंतर येथील सर्व गावांत पाणी‎ पुरवठा योजना पोहाेचतील. त्यामुळे‎ नदीजोड प्रकल्प खारपाणपट्ट्यात‎ फायदेशीर ठरणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...