आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या 69 गावं प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विराेधात साेमवारी शिवसेनेकडून पायी दिंडी काढण्यात येणार आहे. यासाठी गत काही दिवसांपासून 69 गावातील खारे पाणी जमा करण्यात येत असून, हे पाणी टँकरमधून नागपूर दिंडीतून नेण्यात येणार आहे. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकाेल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिण्याची आणि त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती ग्रामस्थ व शिवसैनिक करणार आहेत.
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला. मात्र आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानंतलही त्यांनी जिल्ह्यातील याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. याविराेधात आता वातावरण तापले असून, या याेजना खेचून आणणलेल्या शिवसेनेकडून ग्रामस्थांना घेऊन अकाेला ते उपमुख्यमंत्री राहत असलेल्या नागपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार आहे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख जि.प. गट नेते गाेपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवानकी, विकास पागृत, पूर्वचे प्रमुख राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा आदींनी कळवले आहे
अशी आहे सद्यस्थिती
असा हाेणार श्रीगणेशा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.