आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी चिंतेत:खरिपातील नुकसान भरपाई मिळाली‎ नसतानाच अवकाळीमुळे रब्बीचीही हानी‎

अकाेला‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह‎ अवकाळी पावसामुळे फळबागांचे‎ नुकसान झाले असून, शेतकरी‎ हवालदिल झाला आहे. प्राथमिक‎ सर्वेक्षणात ११५ हेक्टर क्षेत्रावरील‎ पिकांची हानी झाली असून, १९०‎ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.‎ नुकसानीचा अंतिम अहवाल तयार‎ करून भरीव मदत त्वरित न‎ मिळाल्यास आंदाेलन छेडण्यात‎ येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने‎ दिला आहे. अवकाळी पावसाचा‎ फटका पातूर, अकाेट, तेल्हारा‎ तालुक्यातील फळबागा व पिकांना‎ बसला आहे. एकीकडे हाेळीचा‎ जल्लोष करताना शहरी भागात‎ नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून‎ आले हाेते, तर दुसरीकडे अवकाळी‎ पावसाने नुकसान झाल्याने‎ शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू‎ पहावयास मिळत आहे.‎ जिल्ह्यात खरीप हंगामात प्रचंड‎ पाऊस झाला हाेता. त्यानंतर‎ ऑक्टोबर महिन्यात परतीच्या‎ पावसानेही शेतकऱ्यांना धोका दिला ‎हाेता.

असा बसला फटका...‎
बाळापूर तालुक्यातील हातरूण,‎ नया अंदुरा या भागातील मालवाडा,‎ शिंगाेली, लाेणाग्रा, बाेरगाव, हातला,‎ कंचनपूर या भागात पाऊस झाला.‎ परिणामी साेंगून ठेवलेला हरभरा‎ आेला झाला असून, काही ठिकाणी‎ शेतात हरभरा पिकाचे नुकसान‎ झाले.‎कवठा बहाद्दुरा, आलेगाव,‎ आगर, लाेहारा या भागात पाऊस‎ झाला. अनेक ठिकाणी कांदा व‎ हरभरा काढणीला वेग आला असून‎ अवकाळी पावसामुळे पिकांची हानी‎ झाली.‎ अवकाळी पावसामुळे अनेक‎ ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत‎ झाला. परिणामी शेतात हरभरा‎ सांगणीच्या सुरु असलेल्या‎ कामातही व्यत्यय निर्माण झाला.‎ तेल्हारा तालुक्यातील तळेगाव‎ डवला व परिसरातील कांदा, गहु‎ हरभरा या पिकांचे अतोनात नुकसान‎ झाले. गहू जमिनीवर झोपला.‎

बातम्या आणखी आहेत...