आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपण‎:गाथा अभंगात पुरुषार्थ जागवण्याचे‎ सामर्थ्य; मोहन महाराजांचा हिताेपदेश‎

अकाेटएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘जगद्गुरु श्री तुकाराम‎ महाराजांचे जीवन हे गंगाजलासारखे‎ स्वच्छ, शुद्ध , निर्मळ व पवित्र आहे.‎ ते सूर्यासारखे तेजस्वी,‎ स्वयंप्रकाशीत आहे. त्यांच्या या‎ तपस्पी जीवनाचा अभ्यास केल्यास‎ वाचकाच्या अंतरंगातला अंधार व‎ अज्ञान दूर होत पुरुषार्थ जागवण्याचे‎ सामर्थ्य मिळते, संत हेच खरे‎ मायबाप आहेत. त्याची सेवा करा,’‎ असा उपदेश मोहन रेळे यांनी केले.‎

श्री क्षेत्र कालवाडी येथील संत‎ तुकाराम बीज सोहळ्यात गाथा‎ प्रवचनाचे दुसरे पुष्प गुंफताना मोहन‎ महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले,‎ गाथा अभंग हे जीवनाला‎ चंदनासारखे सुगंधीत करतात.‎ कालवाडी सारख्या छोट्याशा‎ गावात त्याचा सुगंध दरवळत आहे.‎ हे या गावाचे परम् भाग्य आहे. ही‎ संतकृपा आहे. गुरुवर्य वासुदेव‎‎‎‎‎‎‎‎‎ महाराजांच्या कृपेने तुकोबांचे देहू या‎ ठिकाणी अवतरले . हे कार्य‎ पंजाबराव हिंगणकर यांच्या हातून‎ करुन घेतले. म्हणूनच ते गुरुकृपेचे‎ धनी ठरले.

श्रद्धासागर व‎ कालवाडी तिर्थस्थळांचे निर्माण हीच‎ त्यांच्या जीवनाची पुर्णाहूती आहे,‎ असे उद्गार मोहन महाराजांनी‎ काढले.‎ फाल्गुन वद्य एकादशीला भाऊंचे‎ पुण्यस्मरण झाल्याशिवाय राहत‎ नाही, असे सांगून त्यांच्या‎ कार्यस्मृतींना उजाळा दिला. वै.‎ पंजाबराव हिंगणकर यांचे कालवाडी‎ ग्रामस्थांनी पुण्यस्मरण केले. रात्री‎ गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर‎ यांचे हरिकीर्तन झाले.‎

बातम्या आणखी आहेत...