आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी‎ वाऱ्यासह मुसळधार पाऊस:वीजपुरवठा सुरळीत करण्याचे‎ काम युद्धपातळीवर सुरू‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या‎ वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा‎ फटका पुन्ह;महावितरणला बसला‎ आहे.अनेक ठिकाणी झाडे, झाडांच्या‎ फांद्या, टिनपत्रे महावितरण खांबावर‎ येऊन पडल्याने १४५ गावांचा‎ वीजपुरवठा खंडित झाला होता.‎ रात्रीपासूनच दुरुस्तीचे काम सुरू‎ करण्यात आले. १२० पेक्षा अधिक‎ गावांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला‎ आहे. तर उर्वरित वीजपुरवठा‎ लवकरच पूर्ववत सुरु होईल, अशी‎ माहिती अधीक्षक अभियंता‎ पवनकुमार कछोट यांनी दिली.‎ जिल्ह्यात काल पुन्हा वादळी‎ वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.‎

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने‎ बाळापूर, पारस या ११ केव्ही वाहिनीवर‎ झाड पडल्याने १२ खांब तुटले,‎ वाकल्याने वीज वाहिनी जमिनदोस्त‎ झाली होती. त्यामुळे ३३ केव्ही बाळापूर‎ उपकेंद्र बंद पडले होते. याशिवाय‎ अनेक ठिकाणी टिनपत्रे, झाडाच्या‎ फांद्या वीज वाहिन्यावर अडकल्याने‎ ४० ते ५० लघूदाबाचे खांब वीज‎ वाहिन्यासहीत पडले आहे. पारस‎ येथील चार ठिकाणाचे रोहित्र हे‎ जमिनीलगत झुकले आहे.

बाळापूर‎ उपकेंद्राचा वीज पुरवठा रात्रीलाच‎ पुर्ववत करण्यात आला आहे. पारस‎ परिसरात वादळाचा परिणाम जास्त‎ झाल्याने महावितरणचेही मोठे‎ नुकसान झाले आहे.अधीक्षक‎ अभियंता पवनकुमार कछोट वीज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दुरूस्तीसाठी पारस येथे हजर आहेत.‎ शहरातील ३३ केव्ही एमआयडीसी, ३३‎ केव्ही सुधीर कॉलनी, ३३ खडकी, ३३‎ केव्ही वाशीम बायपास आणि ३३‎ केव्ही शिवाजी उपकेंद्राशी निगडीत‎ वीज वाहिन्यांवरील ६० ते ७० पीन‎ इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर फुटल्याने‎ हे उपकेंद्र बंद पडली होती. परंतु काही‎ तासातच शहरातील वीज पुरवठा‎ पुर्ववत करण्यात यश आले. उपकेंद्र ते‎ उपकेंद्र जोडणाऱ्या ३३ केव्ही‎ एमआयडीसी ते ३३ केव्ही वणी रंभापूर‎ या वाहिनीवर झाडाच्या फांद्या तुटून‎ पडल्याने ही वाहिनी क्षतीग्रस्त होऊन‎ वीजपुरवठा खंडित झाला होता.

३३‎ केव्ही बोरगाव ते ३३ केव्ही कानशिवणी‎ वाहिनीचे दोन खांब पडल्याने वीज‎ वाहिनी बंद पडून वीजपुरवठा खंडित‎ झाला होता.३३ केव्ही कानशिवणी ते‎ ३३ केव्ही कंझारा लाईनवरील २७ पीन‎ इन्सुलेटर व ६ व्ही ग्लास फुटल्याने‎ वीज वाहिनी तुटली होती. तसेच ३३‎ केव्ही वणी रंभापूर ते ३३ केव्ही अंभोरा‎ वीज वाहिनीचे २ खांब पडल्याने‎ वीजपुरवठा खंडित झाला होता.‎