आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला विभागातील जवळ ८९ कर्मचाऱ्यांना माहे मार्च २०२१ मध्ये अधिसंख्या पदावर वर्ग करण्यात आले होते. त्यामधील ५५ कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथून स्थगनादेश प्राप्त केले होते. उच्च न्यायालयाकडून स्थगनादेश प्राप्त करुन सुध्दा या कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे हे लाभ देण्याची मागणी करणारे निवेदन कर्मचाऱ्यांकडून विभाग नियंत्रकाकडे करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना त्वरित लाभ न मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून देण्यात आला आहे. या बाबत कामगार सेनेनी अनेकदा निवेदने दिलेली आहेत.
तरीसुध्दा या बाबत उपरोक्त कर्मचाऱ्यांबाबत कोणताही सकारात्मक विचार करण्यात आलेला नाही. ज्या कर्मचाऱ्यांनी अधिसंख्या पदाच्या आदेशा विरोधात उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये अधिसंख्या कर्मचाऱ्यांबाबत //"अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैद्य ठरल्यामुळे ज्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावर वर्ग केले आहे. अशा अधिसंख्या पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा विषयक तसेच सेवा निवृत्तीचे लाभ देण्यात यावे, यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा लाभ मिळणार नाही, असे नमुद केलेले आहे.
तरी अकोला विभागाकडून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. न्यायालयाच्या आदेशाचा चुकिचा अर्थ काढण्यात येत असून कर्मचाऱ्यांना याबाबत वेठीस धरण्यात येत आहे. दरम्यान वेतनवाढ, न देण्यात आलेले दोन वर्षाचे दिवाळी सामुग्र अनुदान आणि मागील थकबाकी त्वरीत देण्यात यावी. या बाबत कामगार सेना विभाग अकोला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून लेखी निवेदन दिलेले आहेत. वरील लाभ त्वरीत न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.