आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:वंचित ने रिकाम्या‎ खुर्चीला घातला हार‎

सुलतानपूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात‎ अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर‎ राहात असल्यामुळे उपचासांसाठी‎ येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड होत‎ आहे. त्यामुळे अशा अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून‎ कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची‎ नियुक्ती करण्यात यावी, या‎ मागणीसाठी वंचित बहुजन‎ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार,‎ ४ मार्च रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या‎ रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला‎ संताप व्यक्त केला.‎

नागपूर-मुंबई महामार्गावर‎ वसलेल्या सुलतानपूर येथे प्राथमिक‎ आरोग्य केंद्राची निर्मीती करण्यात‎ आली आहे. या केंद्राला परिसरातील‎ अनेक खेडी जोडण्यात आली आहेत.‎ त्यामुळे सुलतानपूरसह अनेक‎ गावातील विविध आजाराचे रुग्ण या‎ ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात.‎ गावातुन महामार्ग गेल्यामुळे या‎ महामार्गावर अपघाताच्या घटना सुध्दा‎ घडतात. त्यामुळे प्रथमोपचार‎ करण्यासाठी जखमीला येथील‎ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येते.‎

परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय‎ अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे‎ नाइलाजास्तव रुग्णास खासगी‎ दवाखान्यात किंवा इतरत्र हलवण्यात‎ येत आहे. दरम्यान शनिवार, ४ मार्च‎ रोजी सकाळी ९ वाजल्यानंतरही‎ आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व‎ एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे‎ उपचासांसाठी आलेल्या रुग्णांना‎ आल्या पावली परत जावे लागले.‎ त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांवर‎ कारवाई करण्यात यावी. तसेच‎ रुग्णाची होणारी हेळसांड थांबवून‎ कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याची‎ नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र‎ आंदोलन करण्यात येईल. असा इशारा‎ ‘वंचित’चे नागवंशी संघपाल पनाड,‎ ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे,‎ अतीष पनाड, संतोष पनाड, किरण‎ पनाड, राजहंस जावळे, विशाल‎ पनाड, भूषण जावळे, रमेश पनाड‎ यांनी दिला आहे.‎‎

बातम्या आणखी आहेत...