आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या शिवसेना (उद्धव ठाकरे) आग्रही असलेल्या ६९ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती दिल्याच्या विराेधात मंगळवारी ग्रामस्थ आंदाेलन करणार आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वात हाेणाऱ्या आंदाेलनात २ हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थ सहभागी हाेण्याचा दावा केला आहे. िजल्हाधिकारी कार्यालयासमाेर हाेणाऱ्या या आंदाेलनासाठी ४ हजार चाैरस फुटाचे २० मंडप टाकले आहेत.
दरवर्षी बाळापूर व अकाेला तालुक्यात पाणीटंचाई िनर्माण हाेत असल्याने बाळापूर तालुक्यातील ५३ व अकोला तालुक्यातील १६ गावे अशा ६९ गावांसाठी जल जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केली.
यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार िनतीन देशमुख, िज.प. गटनेते गाेपाल दातकर यांच्यासह या दाेन्ही तालुक्यातील िज.प.-पं.स सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठका झाल्या हाेत्या. त्यानंतर तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात या याेजनेला सर्व मान्यता प्रदान करून िनधीही मंजूर केला. मात्र आता उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असल्यानंतरही त्यांनी याेजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.