आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक नियमित झाले आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू करण्यात येतील? अशी विचारणा माजी केंद्रीय राज्यमंत्री, खासदार संजय धोत्रे यांनी भुसावळ मंडळाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागातून नागपूर व वर्ध्यासाठी पॅसेंजर गाड्या चालवल्या जात होत्या. या गाड्यांमुळे विदर्भातील सर्वसामान्यांना प्रवासाची सुविधा मिळत होते. मात्र, कोविड काळात या गाड्या बंद कराव्या लागल्यात. आता हळूहळू रेल्वेने सर्व गाड्या नियमित वेळापत्रकानुसार चालवण्यास सुरुवात केली. मात्र, पॅसेंजर गाड्यांबाबत निर्णय घेतला नाही. पॅसेंजर गाड्या सुरू न झाल्याने परिणामी इतर गाड्यांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. व्यस्त मार्गावर पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवाशांना सुविधा द्यावी, अशी मागणी खासदार धोत्रे यांनी केली. एसटीचे भाडे परवडत नाही : पॅसेंजर गाड्यांचे तिकीट कमी आहेत. त्या तुलनेत आरक्षित गाड्यांच्या तिकीट चौपट असतात. शिवाय सध्या बुकिंग शिवाय जनरलमध्येही प्रवास करता येत नाही. यामुळे तत्काळ कुठे जायचे असल्यास एसटीशिवाय पर्याय नाही. एसटी भाडे पॅसेंजर गाड्याच्या तुलनेत प्रवाशांना परवडणारे नाही. या गाड्यांची आहे प्रतीक्षा Âगाडी क्रमांक ११३९४- वर्धा-भुसावळ Âगाडी क्रमांक ११३९५- भुसावळ-वर्धा Âगाडी क्रमांक ११३८५- नागपूर-भुसावळ Âगाडी क्रमांक ११३८६ - भुसावळ-नागपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.