आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन आचारसंहितेचा बसला फटका‎:प्रोत्साहन अनुदानापासून‎ 13,683 शेतकरी वंचित‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत त्यानंतर पदवीधर‎ निवडणूक आचारसंहितेमुळे दोन‎ महिन्यांपासून प्रोत्साहन अनुदानाची‎ यादी रखडली होती. आता दुसरी यादी‎ जिल्ह्यास प्राप्त झाली. यामध्ये फक्त २‎ हजार ६११ शेतकऱ्यांचा समावेश आहे.‎ प्रतिक्षेतील १३ हजार ६८३ शेतकऱ्यांचा‎ भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे‎ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष‎ निर्माण झाल्याचे चित्र आहे.‎ तीनपैकी दोन वर्षे नियमित पीक‎ कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना‎ ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात‎ आहे. यापूर्वी तीन वर्षांपासून कित्येकदा‎ फक्त घोषणा करण्यात आलेल्या‎ होत्या, आता प्रत्यक्ष लाभ मिळायला‎ सुरुवात झालेली आहे.

जिल्ह्यात १.८०‎ लाख शेतकऱ्यांना ९०० कोटींची‎ कर्जमाफी देण्यात आलेली आहे.‎ यामध्ये नियमित खातेदारांना कोणताही‎ फायदा झालेला नसल्याने त्यांच्यामध्ये‎ नाराजी होती. त्यामुळे शासनाने ५०‎ हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा‎ निर्णय घेतला. दरम्यान, राज्यात‎ सत्तांतर झाल्यानंतरही प्रोत्साहन लाभ‎ देण्याचा निर्णय या सरकारने कायम‎ ठेवलेला आहे. परंतु, निवडणूक‎ आचारसंहितातेचा फटका लाभार्थी‎ शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील‎ ३२ हजार ४८६ पात्र शेतकऱ्यांपैकी २‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हजार ६११ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त‎ झाले आहेत. अजूनही १३ हजार ६८३‎ शेतकऱ्यांना अनुदान खात्यात जमा न‎ झाल्याने त्यांची निराशा झाली आहे.‎ गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात‎ अतिपावसामुळे शेत पिकांचे मोठे‎ नुकसान झाले. त्यातच आता शासकीय‎ दिरंगाईचा फटका बसत आहे.‎

योजनेची जिल्ह्यातील‎ अशी आहे स्थिती‎ प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यातील ३२‎ हजार ४८६ शेतकरी पात्र ठरले आहेत.‎ त्याच्या तुलनेत पहिल्या यादीत १६ हजार‎ २ आणि दुसऱ्या यादीत २ हजार ६११‎ शेतकऱ्यांना खात्याला विशिष्ट क्रमांक‎ प्राप्त झालेला आहे. यापैकी ज्या‎ खातेदारांनी आधार लिंकची प्रक्रिया‎ केलेली आहे. अशा १४ हजार ३४५‎ शेतकऱ्यांना ६५.१० कोटींचा लाभ‎ आतापर्यंत मिळालेला आहे. अद्याप १३‎ हजार ६८३ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. या‎ योजनेसाठी जिल्ह्यातील ३२ हजार ४८६‎ शेतकरी खातेदार पात्र ठरले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...