आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच तालुक्यात विम्याचा‎ परतावा:पीक विम्यापासून 15 हजार‎ शेतकरी अजूनही वंचित‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीक विमा म्हणजे कृषी विभागाला‎ अवघड जागेचे दुखणे झालेले आहे.‎ खरिपाच्या नुकसान भरपाईत डावललेल्या‎ पाच तालुक्यांतील फक्त २ हजार ३०९‎ शेतकऱ्यांना १.०६ कोटीची भरपाई‎ कंपनीद्वारा तत्काळ देण्यात आली. परंतु‎ याच तालुक्यातील किमान १५ हजार‎ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप‎ शेतकऱ्यांकडून होत आहे.‎ यंदाच्या खरिपातील पीक ८४ महसूल‎ मंडळांत अतिवृष्टी व सततच्या पावसाने‎ उद्ध्वस्त झालेले आहे. अर्ज ग्राह्य‎ धरण्यात यावेत, यासाठी पीक विमा‎ कंपनीकडे १.२६ लाख शेतकऱ्यांनी विहित‎ मुदतीत पूर्वसूचना दाखल केलेल्या‎ आहेत.

त्यापैकी तब्बल २६ हजार ३८४‎ अर्ज कंपनी स्तरावर नाकारण्यात आले.‎ याशिवाय ८४ महसूल मंडळांत अतिवृष्टी‎ व सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे‎ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरासरी‎ उत्पादन ५० टक्क्यांनी कमी येत असल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जिल्हाधिकाऱ्यांनी ८० महसूल‎ मंडळांसाठी अधिसूचना जाहीर केली.‎ यानंतर एका महिन्यात शेतकऱ्यांना‎ सरसकट विमा देणे कंपनीला बंधनकारक‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...