आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या शेतकरी खातेदारांनी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी केली व आतापर्यंत १२ हप्त्याचा लाभ घेतला, यापैकी तब्बल १९ हजार शेतकऱ्यांच्या शेतीचा पत्ता अद्याप महसूल विभागाला लागलेला नाही. त्यामुळे हे खातेदार आता योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी अपात्र ठरले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत दर चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ पात्र खातेदाराला देण्यात येतो.
योजनेत अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास येताच महसूल विभागाद्वारा सर्वच खातेदारांची पडताळणी करण्यात येऊन त्यांच्या शेतीविषयक नोंदी पोर्टलवर घेतल्या जात आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेकांना लाभ मिळत होता. हे आता बंद झाले आहे. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जवळ शेती नाही, अशाही काही शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, हे आता निदर्शनास आल्याने त्यांना लाभ मिळणे या हप्त्यापासून बंद झाले आहे. या योजनेद्वारे सन २०१९ पासून नोंदणी केलेल्या शेतकरी खातेदाराला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी सहा हजारांचा लाभ दिल्या जातो. ३.३९ लाख खातेदारांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. या खातेदारांची शेतीविषयक माहिती आता महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेद्वारा नोंदवल्या जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.