आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास उन्हाची दाहकता तर रात्रीच्या वेळी मात्र गारवा जाणवत आहे. रविवारी रात्रीचे किमान तापमान १२.४ अंश तर दुपारचे कमाल तापमान तब्बल ३२.८ अंश होते. दोन तापमानातील फरक २०.४ अंशांपेक्षा अधिक आहे. वातावरणातील हा बदलाचा लंपडाव मानवी आरोग्यासाठी त्रासदायक तर पिकांसाठी घातक ठरत आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात काही दिवस पारा चांगलाच खाली होता. त्यामुळे आठ ते दहा दिवस थंडी जाणवली होती. त्यानंतर मात्र रात्रीच्या वेळी पारा १५ ते १६ अंशांवर गेला होता. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. परंतु मागील तीन ते चार दिवसांपासून पुन्हा एकदा रात्रीला थंडी जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढली आहे. २ व ३ फेब्रुवारीला तर किमान तापमान १०.५ अंशांपर्यंत खाली आले होते. आता रात्रीच्या वातावरणात थोडी वाढ झाली आहे, परंतु ते १२ अंशांपर्यंतच आहे.
आता चार दिवस किमान तापमानात थोडी वाढ होणार श्वसनाशी संबंधित आजार असलेल्यांना त्रास तापमानातील मोठ्या फरकामुळे ज्या रुग्णांना श्वसनाशी संबंधित आजार आहे, त्यांचा त्रास वाढतो. जसे दमा, तसेच ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे. त्यांच्या त्रासात आणखी वाढ होते. सोबतच विषाणू संसर्गही वाढतो. - डाॅ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी.
सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात विषम तापमान हे लहान बाळांसह ज्येष्ठ नागरिक व सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे. यात मोठ्या प्रमाणात विषाणू संसर्गाचा त्रास होतो. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात. या काळात काळजी घेण्याची गरज आहे. - डाॅ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.