आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अवघ्या 795 रुपयांमध्ये वीस लाखांचा विमा‎ ; उपचारासाठीही मिळतात योजनेद्वारे पैसे‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टपाल कार्यालयाने टाटा एआयजी‎ आणि बजाज अलायन्स या दोन‎ विमा कंपन्यांसोबत एकत्रित येऊन‎ अपघात विमा योजना आणली‎ आहे. या दोन्ही योजना मिळून ७९५‎ रुपयांचा प्रीमिअम भरून टपाल‎ विभागाकडून हा अपघात विमा‎ उतरवण्यात येत आहे. जिल्ह्यात‎ आतापर्यंत १९ हजार ८४४‎ नागरिकांनी या योजनेचा लाभ‎ घेतला असून, यातील सात ते‎ आठ लाभार्थ्यांना किरकोळ‎ अपघातानंतर उपचारासाठी‎ विम्याचा लाभ मिळाला‎ असल्याची माहिती डाक‎ विभागाकडून देण्यात आली.‎ अचानक अपघात झाल्यावर‎ एखाद्या व्यक्तीवर अथवा त्यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कुटुंबीयांवर मोठा आघात होतो.‎ शरीराची हानी तर होतेच, शिवाय‎ उपचाराचा खर्च कोठून करायचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असा प्रश्नही उभा राहतो. यासाठी‎ टपाल खात्याने कमी पैशांत टाटा‎ एआयजी आणि बजाज‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अलायन्स या दोन विमा‎ कंपन्यांसोबत एकत्रित विमा‎ योजना आणली आहे.

यामध्ये‎ यामध्ये टाटा एआयजी ३९९ रुपये‎ आणि बजाज अलायन्स ३९६‎ रुपये असा एकूण ७९५ रुपयांत हा‎ विमा काढण्यात येत आहे. वर्षाला‎ ७९५ रुपयांचा हप्ता भरून टपाल‎ विभागाकडून हा विमा‎ उतरवण्यात येतो. दरवर्षी विमा‎ रिन्यूअल करणे गरजेचे आहे.‎ अपघात घडल्यानंतर वैद्यकीय‎ खर्चासाठी खर्चाच्या बिलासोबत‎ विमा कंपनीकडे अर्ज करावा‎ लागतो. रुग्णालयाचा संपूर्ण लेखी‎ तपशील मूळ कागदपत्रांसह विमा‎ कंपनीला सुपूर्द करावा लागतो.‎ जिल्ह्यात टपाल विभागाकडे‎ आतापर्यंत १९ हजार ८४४‎ नागरिकांनी अपघाती विमा‎ काढला आहे. जिल्ह्यातील‎ कोणत्याही टपाल कार्यालयातून‎ विमा काढता येऊ शकतो.‎

अपघात विमा योजनेचा‎ लाभ कसा घ्याल‎ टपाल विभागाकडून विमा‎ काढलेल्या व्यक्तीचा अपघातात‎ मृत्यू झाल्यास टाटा एआयजी व‎ बजाज अलायन्स या दोन्ही‎ कंपनीकडून प्रत्येकी दहा लाख‎ रुपयांचा विमा संबंधित व्यक्तीच्या‎ कुटुंबीयांना दिला जातो. तसेच‎ व्यक्तीला अपघातामध्ये‎ कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास‎ किंवा एक हात, एक पायही‎ गमवावा लागला असेल तरीही‎ दोन्ही कंपनीकडून प्रत्येकी दहा‎ लाख रुपयांचा लाभ दिला जातो.‎

नागरिकांनी योजनेचा‎ लाभ घ्यावा‎ टपाल विभागामार्फत दुर्गम‎ भागात पोस्टमन आपली सेवा‎ देतात. त्याच प्रकारे आता‎ अतिदुर्गम ग्रामीण भागातील‎ नागरिकांसाठी टपाल विभाग‎ अपघाती विमा योजना घेऊन‎ आला आहे. अगदी माफक दरात‎ ही अपघात योजना आहे. जिल्ह्यात‎ आतापर्यंत १९ हजारच्या वर‎ नागरिकांनी या योजनेचा लाभ‎ घेतला आहे.‎ -वसुंधरा गुल्हाने, प्रवर डाक‎ अधीक्षक.‎ आवश्यक कागदपत्रे‎ या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी‎ कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा‎ करण्याची गरज नाही. पेपरलेस‎ पद्धतीने विम्याचा फॉर्म भरून घेतला‎ जातो. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड‎ दाखवावे लागतात. तसेच नॉमिनीचे‎ पूर्ण नाव, जन्मतारीख व व्हॅलिड ई-‎ मेल आयडी आवश्यक आहे.‎

बातम्या आणखी आहेत...