आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची गैरसोय‎:एसटीच्या अमरावती विभागामध्ये‎ 50 फेऱ्या बंद, महिन्याअखेर 1 कोटींचा खर्च; 15 हजार किलो मीटरचा प्रवास कमी‎

अमरावती‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विभागातील 104 एसटी बस‎ एक्स्पायर झाल्याने गत दोन वर्षांपासून ‎ ‎ लांब पल्ल्याच्या २१ आणि मध्यम ‎ ‎ पल्ल्याच्या 29 बस फेऱ्या अशा एकूण‎ 50 फेऱ्या बंद कराव्या लागल्या‎ आहेत. परिणामी, दिवसाला 15 हजार ‎ ‎ किलोमीटर प्रवास कमी झाला आहे. ‎ ‎

त्यामुळे एसटीला दिवसाकाठी‎ साडेचार लाख रुपये आणि‎ महिन्याकाठी सुमारे १ कोटी रुपयांचा ‎ ‎ फटका सहन करावा लागत आहे.‎ अमरावती विभागाने एसटी ‎ ‎ महामंडळाकडे १०० नवीन बसची‎ मागणी केली आहे. त्यापैकी २० बस ‎ ‎ आगामी काही दिवसांत मिळणार ‎ असल्या तरी आजघडीला ज्या बस ‎ आहेत. त्यांचीही स्थिती फारशी‎ चांगली नाही. त्यापैकी काही‎ कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.‎ त्यामुळे एसटी महामंडळाने‎ अमरावतीला विभागात नवीन बस‎ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.‎

महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक,‎ दिव्यांग हे एसटीमधून मोठ्या‎ ‎‎ प्रमाणात प्रवास करतात. त्यांची‎ अडचण होऊ नये म्हणून एसटीने‎ विभागातील एसटी फेऱ्या कायम‎ ठेवल्या असल्या तरी लांब व मध्यम‎ पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्याने‎ लांबवर प्रवास करणारे प्रवासी सध्या‎ त्रस्त आहेत. सध्या अमरावती‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎विभागात ४५ शिवशाही अन् हिरकणी‎ आहेत. त्यांच्याही फेऱ्या कमी झाल्या‎ आहेत.‎ दोन वर्षांपूर्वी अमरावती विभागाकडे‎ ४६५ बस होत्या. त्यापैकी १०४ बस‎ निर्लेखित केल्या. ३६१ बस एकाच‎ वेळी रस्त्यावर धावत नाहीत.‎

एसटीला आर्थिक‎ फटका बसतोय‎ एसटी बस कमी झाल्यामुळे लांब व‎ मध्यम पल्ल्याच्या बसच्या फेऱ्या या‎ निम्म्याने कमी कराव्या लागल्या‎ आहेत. त्यामुळे दिवसाला सुमारे‎ साडेचार लाखांचे नुकसान सहन‎ करावे लागत आहे.‎

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक.‎

२० ते ३० रुपये प्रतिकिमी प्रवासभाडे‎

लांब पल्ल्याच्या किंवा मध्यम पल्ल्याच्या बससाठी २० ते ३० रुपये प्रति‎ किलोमीटर भाड्याखाली जाते; परंतु पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,‎ जळगाव फेच्या ५० टक्के घटल्याने साहजिकच उत्पन्नातही घट झाली आहे.‎ २० ते ३० रुपये किमी दराने एसटीचे दररोज ४ लाख ५० हजारांचे, तर‎ महिन्याला सुमारे १ कोटी लाखांचे उत्पन्न बुडत आहे.‎