आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎टपाल विभागानेही‎ ई-प्रणाली सुरू केली‎:ऑनलाइनच्या युगातही शहरात 56 पत्रपेट्या, पत्रपेटीत दररोज टाकली जातात पत्रे

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगणक व मोबाइलच्या युगातही‎ शहरात 56 पत्र पेट्या अस्तित्त्वात‎ असून, त्यात दररोज पत्रेही टाकली‎ जातात. यात बहुतांश पत्रे ही‎ शासकीय असतात, हा भाग‎ निराळा.‎ सुमारे एका दशकापूर्वी‎ नातेवाइक, मित्रांना संदेश‎ पाठवण्यासोबतच ख्याली, खुशाली‎ कळवण्याचे प्रमुख माध्यम हे पत्र‎ हेच होते. पत्र पाठवले की, त्याच्या‎ उत्तराचीही लोक आतुरतेने वाट‎ बघत बसायचे.

सध्या‎ मोबाइलद्वारे थेट विदेशात बोलता‎ येते, व्हाॅट्सअॅप, ट्विटरद्वारे संदेश‎ देता येतो. संगणकाद्वारे ई-मेल,‎ फेसबुकच्या माध्यमातून केवळ‎ काही सेकंदात संदेश वाचता येतो.‎ त्यामुळेच पत्र पाठवण्याची‎ कोणालाही आवश्यकता राहिली‎ नाही. संदेशवहनातील क्रांतीमुळे पत्र‎ पाठविण्याची पद्धत जवळ-जवळ‎ संपुष्टात आली आहे. असे‎ असताना शहरात 56 पत्र पेट्या‎ अस्तित्त्वात असल्याबद्दल आश्चर्य‎ व्यक्त होत आहे.‎

या पत्र पेट्या दिवसातून दोनदा‎ सकाळी ७ व दुपारी ३ वाजता‎ उघडून त्यातील पत्रे डाक‎ विभागाद्वारे दिलेल्या पत्त्यावर‎ पाठवण्यासाठी गोळा केली जातात.‎ नंतर दळणवळणाच्या विविध‎ माध्यमांद्वारे ती संबंधित पत्त्यावर‎ पाठवली जातात. शहरात‎ दिवसभरात शासकीय तसेच इतर‎ अशी एकूण ५ हजारावर पत्रे‎ पाठवली जात आहेत. प्रत्येक डाक‎ कार्यालयापुढे एक पत्रपेटी ठेवण्यात‎ आली आहे. त्यातून ही पत्र डाक‎ विभागाचे वाहन ठराविक वेळेत‎ गोळा करत असते.

दिवाळी,‎ रक्षाबंधनाला स्पीड पोस्टचा मोठया‎ प्रमाणात वापर होतो. इतर वेळी मात्र‎ सर्वसामान्य फारसे पत्र पाठवत‎ नाहीत. शासकीय पत्रे वगळता‎ सध्या पत्र पाठवणाऱ्यांच्या संख्येत‎ आधीच्या तुलनेत मोठया प्रमाणात‎ घट झाल्याची माहिती डाक‎ विभागाद्वारे देण्यात आली.‎

टपाल‎ विभागही कात टाकत आहे

सध्या बहुतेकांकडे स्मार्ट फोन‎ आहेत. त्यामुळे संदेश‎ पोहोचवण्याचे काम पत्राच्या तुलनेत‎ वेगाने होते. संगणक व मोबाइलच्या‎ युगात डाक विभागानेही ई-पोस्ट,‎ स्पीड पोस्ट, बिझनेस पोस्ट,‎ लॉजिस्टिक पोस्ट सारखी ई-प्रणाली‎ सुरू केली आहे. काळानुसार टपाल‎ विभागही कात टाकत आहे.‎ नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध‎ करुन दिल्या जात आहेत.‎

-डाॅ. वसुंधरा गुल्हाने, अधीक्षक,‎ डाक विभाग.‎