आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचे चटके:अमरावती शहराचा पारा 44.6 अंश‎, मोचा चक्रीवादळाकडे बाष्प वळल्याचा परिणाम‎, रस्त्यांवरची वर्दळ रोडावली‎

प्रतिनिधी | अमरावती‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मागील चार ते पाच ‎ ‎ दिवसांपासून तापमानात सातत्याने‎ वाढ होत आहे. आज (दि. १३)‎ पारा विक्रमी ४४.६ अंशावर‎ पोहोचला होता. सकाळी दहा‎ वाजतापासूनच आज सूर्य अक्षरश: ‎ आग ओकत होता. त्यामुळे‎ दिवसभर शहरातील रस्ते निर्मण्युष्य‎ दिसत होते. आगामी दोन ते तीन‎ दिवसात पारा ४५ अंशाच्या पुढे‎ जाणार असल्याचा अंदाज हवामान‎ अभ्यासकांनी वर्तवला आहे.‎

एप्रिल महिन्यात सतत झालेल्या‎ अवकाळी पावसामुळे वातावरणात‎ ४ ते ५ मेपर्यंत फार उकाळा नव्हता.‎ ‎पारा ३९ ते ४० अंशापर्यंत स्थिरावला‎ होता. मात्र ६ मे पासून दरदिवशी‎ तापमानात वाढ सुरू आहे. मात्र‎ गुरूवारपासून (दि. ११) तर पारा‎ प्रचंड झपाट्याने वर चढत होता.‎ शुक्रवारी शहरात ४३ अंशाच्या‎ आसपास होता. तेच शनिवारी‎ एकदम पारा ४४.६ अंशावर गेला.‎‎ एकाचदिवशी सुमारे १.६ अंशाने‎ वाढ झाल्यामुळे शनिवारी दिवसभर‎ उन्हाची दाहकता चांगलीच जाणवत‎ होती. दुपारच्यावेळी दुचाकीवर‎ अक्षरश: चटके जाणवत होते.‎ तापमानात अचानक वाढ‎ झाल्यामुळे असह्य उकाडा शनिवारी‎ अमरावतीकरांनी अनुभवला.‎

तापमान वाढणार

जिल्ह्यावर मागील सहा दिवसांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात बाष्पाचा परिणाम‎ होता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून बाष्प मोचा चक्रीवादळाच्या‎ दिशेने वळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण कोरडे झाले आहे.‎ त्यामुळेच तापमानात वाढ झाली असून, आगामी दोन ते तीनच दिवसात पारा‎ ४५ अंश ओलांडणार आहे.‎ डॉ. सचिन मुंढे, कृषी हवामान शास्त्रज्ञ.‎