आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:यंदाच्या खरिपात होणार‎ तूर, कपाशी क्षेत्रात वाढ‎, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा कपाशी, तूर,‎ सोयाबीनला सध्याही हमीभावापेक्षा‎ जास्त भाव असल्याने या पिकांची‎ काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता‎ आहे.‎ मूग व उडदाचे पीक दरवर्षीच‎ पावसाअभावी बाधित होत आहे. या‎ वर्षीदेखील ‘एल निनो’च्या प्रभावाने‎ सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज‎ काही हवामान विषयक संस्थांनी‎ वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची‎ चिंता वाढली आहे.

अमरावती‎ महिनाभरावर आलेल्या खरीप‎ हंगामासाठी कृषी विभाग कामाला‎ लागला आहे. यामध्ये प्रस्तावित क्षेत्र‎ व त्यासाठी लागणारी रासायनिक‎ खते, बियाण्यांसाठी नियोजन सुरू‎ आहे. यंदाच्या खरिपासाठी ६.८१‎ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे‎ नियोजन केले आहे व या अनुषंगाने‎ विभागीय कृषी विभागाने आढावा‎ घेतला.जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक‎ क्षेत्र आहे.

तालुकानिहाय पथके

कृषी‎ विभागाद्वारे बियाणे, खतांचा‎ काळाबाजार होऊ नये, बियाण्यांची‎ टंचाई भासू नये तसेच नियमबाह्य व‎ बनावट बियाणे विक्री होऊ नये,‎ यासाठी जिल्हास्तर एक व‎ तालुक्याचे १४ अशी १५ पथके तयार‎ करणार आहेत. या पथकांचा या‎ प्रकारांवर वॉच राहणार असल्याचे‎ कृषी विभागाने सांगितले.‎ यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाद्वारे‎ २ लाख ९७ हजार ८०५ मे. टन‎ रासायनिक खतांची मागणी नोंदवली.‎

कृषी‎ विभाग लागले कामाला

१.२२ लाख क्विंटल‎ बियाण्यांची गरज‎ यंदाच्या खरीप हंगामासाठी १, लाख‎ २१ हजार ५२९ क्विंटल बियाणे‎ लागण्याची शक्यता आहे. यामध्ये‎ ६४,१३१ क्विंटल सार्वजनिक व‎ ५७,३१८ क्विंटल खासगीरीत्या‎ उपलब्ध होणार आहेत. याशिवाय‎ ६१,५०९ क्विंटल बियाणे महाबीज‎ उपलब्ध करणार आहेत. यंदा‎ सर्वाधिक १,०५,२५० क्विंटल‎ सोयाबीन बियाणे लागण्याची‎ शक्यता आहे. या अनुषंगाने कृषी‎ विभाग कामाला लागला आहे.‎

पीकनिहाय प्रस्तावित‎ क्षेत्र (हेक्टर)‎

सोयाबीन ५५,०००‎ सं. कापूस २,६०,०००‎ तूर १,१३, ०००‎ मूग ७,८००‎ उडीद १,९०‎ ज्वारी १२०००‎ धान ७.९००‎ ६.८१ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन‎