आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारेगावात तीन दिवसीय‎ भीम जयंती महोत्सव‎:विकास राजा व सुनीता कीर्तने यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम‎

मारेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या‎ पर्वावर मारेगाव येथे दरवर्षी प्रमाणे‎ //"भीम जयंती महोत्सव २०२३’ चे‎ आयोजन करण्यात आले आहे. यात‎ ११ ते १४ एप्रिल दरम्यान वैचारिक व‎ प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमाचे‎ आयोजन ‘जय भीम उत्सव समिती,‎ मारेगाव’च्या वतीने करण्यात आले‎ आहे.‎ यामध्ये ११ एप्रिल रोजी महात्मा‎ ज्योतिबा फुले जयंती निमित्त‎ अभिवादनाचा कार्यक्रम. १२ एप्रिल‎ रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध‎ प्रबोधनकार विकास राजा, नागपूर‎ यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक‎ कव्वाली. तर १३ एप्रिल रोजी‎ प्रबोधनकार सुनिताताई कीर्तने यांचा‎ सुद्धा प्रबोधनात्मक संगीतमय‎ मेजवानी. हे दोन्ही कार्यक्रम‎ सायंकाळी ६ वाजता येथील‎ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या‎ पटांगणात आयोजित केले आहे.‎

तसेच १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा.‎ महामानवास अभिवादन तर सकाळी‎ १० वा. प्रसिद्ध व्याख्याते चंद्रा भाऊ‎ ठाकरे यांचे बाबासाहेबांची धम्म‎ क्रांती या विषयावर जाहीर व्याख्यान‎ तसेच स.११ वाजता शहरातून भव्य‎ बाइक रॅली तर सायंकाळी ६ वाजता‎ ढोल ताशांच्या गजरात भव्य‎ मिरवणुकीचे आयोजन करण्यात‎ आले आहे.‎ या कार्यक्रमाचे उदघाटक‎ यवतमाळ येथील सामाजिक‎ कार्यकर्ता डॉ. निरज वाघमारे हे‎ आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष‎ जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक‎ अध्यक्ष गौरीशंकर खुराणा तसेच‎ कला वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालय मारेगाव चे प्राचार्य‎ प्रा.डॉ. अविनाश घरडे हे आहेत. तर‎ प्रमुख अतिथी नगराध्यक्ष डॉ. मनिष‎ मस्की, सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र‎ लोढा, प्राचार्य संजय तेलतुंबडे, कुंभा‎ चे सरपंच अरविंद ठाकरे, जेष्ठ‎ सा.कार्यकर्ता पुंडलिकराव साठे,‎ माजी पो.पाटील तात्याजी चिकाटे तर‎ विशेष अतिथी म्हणून तहसीलदार‎ दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी,‎ वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर,‎ ता.आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना‎ देठे, भा. बौ.महासभेचे ता.अध्यक्ष‎ धर्मराज सातपुते याची प्रमुख‎ उपस्थित राहणार आहे.

या तीन‎ दिवसीय कार्यक्रमाचा लाभ‎ परिसरातील तमाम समाज बांधवांनी‎ घ्यावा असे आवाहन जय भीम‎ उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत नराजें,‎ उपाध्यक्ष नागेश रायपूरे, सचिव गौतम‎ दारुंडे, कोषाध्यक्ष अनंत खाडे,‎ सहसचिव नुतन ताई तेलंग,‎ कार्याध्यक्ष रेखाताई काटकर, गौरव‎ चिकाटे, ओमप्रकाश पाटील,‎ वसुमित्र वनकर, सुवर्णा नराजें, मीना‎ दिगाडे, अश्विनी खाडे, सपना‎ वनकर, पुष्पा दारुंडे, आकाश भेले,‎ सुदर्शन पाटील, आदींनी केले आहे.‎