आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून, विभागीय मंडळाने परीक्षेची बहुतांश तयारी पूर्ण केली आहे. कोरोनानंतर दोन वर्षानी विद्यार्थ्यांची परीक्षा ही शिक्षण मंडळाकडून देण्यात येणाऱ्या अन्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे. जिल्ह्यात बारावीचे १ लाख ३९ हजार ३४५ विद्यार्थी तर दहावीचे १ लाख ५८ हजार २९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. दहावीचे जिल्ह्यात ७१६ केंद्र आहेत.
तसेच बारावीची ५२३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यंदा पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही जोमाने तयारी करण्याचा सल्ला शिक्षक व पालकांकडून दिला जात आहे. विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी केंद्र निश्चित केली असून, बहुतांश केंद्रांमध्ये उत्तरपत्रिकांचे वितरणही केले आहे. कोरोनाकाळात पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांची परीक्षाच झाली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. गतवर्षी गृह महाविद्यालय परीक्षा केंद्र देण्यात आले. परीक्षेसाठी ७५ टक्के अभ्यासक्रम देण्यात आला. त्यामुळे परीक्षेची भीती नव्हती.
याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावरही दिसून आला. त्यामुळे २ वर्षानंतर विद्यार्थ्यांना या पूर्वीच्या परीक्षाप्रमाणे सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात बारावीचे १ लाख ३९ हजार ३४५, तर दहावीचे १ लाख ५८ हजार २९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीचे जिल्ह्यात ७१६ केंद्र आहेत. तसेच बारावीची ५२३ केंद्रावर विद्यार्थी परीक्षा देणार आहे. कधी नव्हे ते दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांच्या वर होती. त्यामुळे परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, यंदाच्या शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. या वर्षीची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. त्यामुळे यंदाची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी कसोटी ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.