आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अस्मिता योजना बंद असल्याने‎ महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ; ‎विधीमंडळात उपस्थित‎ केला लक्षवेधी मुद्दा‎‎

अमरावती‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महिलांना पाच रुपयात आठ‎ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना‎ सध्या बंद आहे. त्यामुळे ग्रामीण व‎ शहरी भागातील महिलांच्या‎ आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.‎ महिलांच्या आरोग्यविषयक हा‎ महत्वाचा मुद्दा आमदार सुलभा‎ खोडके यांनी विधीमंडळात उपस्थित‎ केला. दरम्यान, एका महिन्यात‎ अस्मिता योजना सुरू करण्याची‎ मागणी यावेळी आमदार खोडके यांनी‎ केली आहे.‎ महिलांना तसेच शालेय मुलींना‎ सॅनिटरी नॅपकीन अभावी‎ आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड‎ द्यावे लागते. त्यामुळे याबत जनजागृती‎ करून अल्प दरात महिलांना व मुलींना‎ सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे शक्य‎ व्हावे, या दृष्टीकोनातून राज्यातील‎ महिलांसाठी पाच रुपयात आठ‎ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना‎ तत्कालीन सरकारने २०१८ मध्ये सुरू‎ केली होती.

सदर योजनेत वर्ष २०१९‎ मध्ये ५० हजार बचत गटांनी विक्रीसाठी‎‎‎‎‎ नोंदणी केली होती, त्यापैकी जवळपास‎ ४५ हजार बचत गटांना ऑर्डरही‎ मिळाल्या होत्या. परंतू एप्रिल २०२२‎ पासून कंत्राट संपल्याने सदर योजनेची‎ अंमलबजावणी राज्यात बंद आहे.‎ त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न‎ निर्माण झाले आहे. शासनाकडे‎ अस्मिता योजनेचा सुधारित प्रस्ताव‎ प्रलंबित असून, याबाबत‎ अंमलबजावणी कधी होणार? असा‎ प्रश्न आमदार सुलभा खोडके यांनी‎ उपस्थित केला. अस्मिता योजना सुरु‎ करण्याबाबत महिलांवर्गाकडून मोठया‎ प्रमाणात मागणी होत असल्याने या‎ योजनेच्या सुधारित प्रस्तावास तत्काळ‎ मंजुरी द्यावी. तसेच योजना सुरू‎ करण्यासाठी विलंब का होतो याबाबत‎ त्यांनी स्पष्टीकरण मागितले होते.‎

बातम्या आणखी आहेत...