आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रवीनगर परिसरात राहणारे ४९ वर्षीय व्यक्ती दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ येथून भातकुली मार्गे अमरावतीत येत होते. त्याचवेळी मार्गातील सायत गावाजवळ त्या व्यक्तीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सायंकाळी झाला आहे. संदीप दिगांबर टिंगरे (४९, रा. रविनगर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे.
संदीप टिंगरे यांचे मूळगाव रामतीर्थ असून त्याच ठिकाणी त्यांची शेती आहे. शनिवारी सकाळी टिंगरे दुचाकीने अमरावतीवरून रामतीर्थ येथे गेले होते. सायंकाळी रामतीर्थवरून अमरावतीला परत येत असताना दर्यापूर ते भातकुलीदरम्यान सायत गावाजवळ संदीप टिंगरे यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत टिंगरे यांना जबर मार लागला. ते घटनास्थळीच निपचित पडले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने भातकुलीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अॅड. रामदास तिखीले यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. संदीप टिंगरे हे उत्तम संगणक परिचालक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी शहरातील एका दैनिकात बरेच वर्ष सेवा दिली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.़
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.