आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिट्टीमुळे अपघात:बोरगाव मंजू महामार्गावरील‎ बायपास झाला धोक्याचा‎

बोरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजू‎ राष्ट्रीय महामार्गाच्या‎ चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा‎ महामार्ग बोरगाव मंजू गावाबाहेरून‎ गेला आहे. मूर्तिजापूरकडून‎ बोरगावमंजूकडे, बोरगाव मंजू रेल्वे‎ स्टेशन ते पळसो दहीगावकडे‎ जाण्यासाठी गत काही दिवसांपासून‎ बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर‎ नव्याने बायपास रोडचे काम सुरू‎ आहे.

मात्र, परिसरात अर्धवट‎ झालेले बांधकाम, रस्त्यावर‎ पसरलेली गिट्टी यामुळे नागरिकांना‎ प्रचंड त्रास करावा लागतो आहे.‎ रस्त्याच्या दुरवस्थेतून अपघाताची‎ शक्यता निर्माण झाली आहे.‎ या बायपासवर बोरगाव मंजूकडे‎ जाणाऱ्या व बोरगाव मंजूकडून‎ मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून‎ बहुतांश शेतकरी- शेतमजूर दररोज‎ ये-जा करतात. दरम्यान चारचाकी,‎ दुचाकीस्वार यांना आपले वाहन‎ जीव मुठीत धरून महामार्गावरून‎ प्रवास करावा लागत आहे.

शिवाय‎ ऐन रोडवर गिट्टी, मुरुम असल्याने‎ अनेक दुचाकीस्वार पडून जखमी‎ झाल्याच्या घटना नियमित होत‎ आहेत. या बायपासवर बोरगाव‎ मंजूकडून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या‎ बायपासचे काम सध्या बंद आहे. बंद‎ कामामुळे जिकडे-तिकडे धुळं‎ पसरली आहे. याचा प्रवाशांना‎ नाहक त्रास सहन करावा लागत‎ आहे.‎ दरम्यान गत महिन्यात बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दितील‎ राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची‎ मालिका सुरूच आहे. अपघात‎ रोखण्यासाठी या ठिकाणी संबंधित‎ विभागाने तसेच संबंधित‎ कंत्राटदाराने लक्ष वेधून त्वरीत‎ रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू‎ करावे, जर या ठिकाणी कुठलाही‎ अपघात झाला, तर त्याची‎ जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न‎ नागरिक उपस्थित करीत आहेत.‎ थांबलेलं काम त्वरित सुरू करावे,‎ अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन‎ करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...