आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंधरा दिवसांपुर्वी शहरासह जिल्ह्यात काही ठिाकणी वादळी वारा, गारपिटीसह पावसाने हजेरी लावत नागरिकांसह शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. गेल्या आठवड्यात मेळाघाटात वादळी पावसाने पुन्हा उच्छाद मांडला होता. त्यापासून दिलासा मिळत नाही, तोच पुन्हा निर्माण झालेल्या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पुन्हा बरसण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. सध्या उन्हाचा कडाका वाढला अाहे. अशातच आता हवामान खात्याने विदर्भात ९ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. इराणवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे, तसेच द्रोणिय स्थिती आहे, तर आसामवर चक्राकार वारे वाहत आहेत. झारखंड ते अंतर्गत तामिळनाडूवर ट्रफ रेषा निर्माण झाली असून पावसासाठी वातावरण निर्माण झाले आहे.
या हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात ९ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र १० एप्रिलपासून हवामान कोरडे राहील, अशी माहितीही प्रा. बंड यांनी दिली.
शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना ज्या शेतकऱ्यांनी पेरू बागेत छाटणी केलेली आहे. तेथे झाडावर नवीन फुटवे येत असून सध्याच्या वातावरणात मिलीबग तसेच अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांची गहू कापणी आणि मळणी व्हायची आहे, त्यांनी ती तातडीने करावी. - प्रा. अनिल बंड
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.