आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांची उपस्थिती‎:ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची‎ कामे तत्काळ पूर्ण करा; खा. नवनीत राणा यांचे निर्देश

अमरावती‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व‎ जलजीवन मिशनअंतर्गत खेडोपाडी‎ पाणी पुरवठा योजनांची अनेक कामे‎ प्रस्तावित आहेत. ती तत्काळ पूर्ण‎ करावी. मेळघाटात पाणीपुरवठा‎ योजनांची गरज पाहता ही कामे‎ प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश‎ खा. नवनीत राणा शुक्रवार १० रोजी‎ दिशा समितीच्या बैठकीत दिले.‎ नियोजन भवनात दिशा समितीची‎ बैठक खा. राणा यांच्या‎ अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खा.‎ डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी‎ पवनीत कौर, प्र. मुख्य कार्यकारी‎ अधिकारी संतोष जोशी, महापालिका‎ आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा‎ ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प‎ संचालक प्रीती देशमुख यांच्यासह‎ विविध विभागांचे अधिकारी‎ उपस्थित होते.‎

गावोगावी नियमित व शुद्ध‎ पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.‎ त्यासाठी जलजीवन मिशनमधील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कामे पूर्ण करावी. आवास योजनेमुळे‎ गरीबांचे घरांचे स्वप्न साकार होते.‎ त्यानुसार सर्वांसाठी घरे योजनेत‎ ठिकठिकाणी कामे सुरू करण्यात‎ आली. मात्र, गत वर्षात त्यांची गती‎ मंदावल्याचे दिसते. योजनेच्या प्रभावी‎ अंमलबजावणीसाठी या कामांना वेग‎ द्यावा. शाळांच्या नादुरुस्त इमारती‎ तात्काळ दुरुस्त करुन घ्याव्यात, असे‎ निर्देश खा. राणा यांनी दिले. मनरेगा‎ योजनेतून मेळघाटात, तसेच‎ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्ते,‎ बंधारे, जलसंवर्धन, गुरांचे गोठे,‎ वृक्षारोपण अशी अनेक कामे केली‎ जातात.

मनरेगाद्वारे रोजगार‎ निर्मितीबरोबरच कायमस्वरुपी‎ पायाभूत सुविधा निर्माण होत‎ असल्यामुळे त्यांचा दर्जा चांगला‎ असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने‎ प्रशासनाने प्रयत्न करावे, असे निर्देश‎ खासदार डॉ. बोंडे यांनी दिले. ग्रामीण‎ रस्त्यांची निर्मिती केल्यानंतर काही‎ वर्षातच ते नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी‎ प्राप्त होतात. त्यामुळे आवश्यक तिथे‎ रस्त्यांची दुरुस्ती वेळोवेळी करण्यात‎ यावी, असेही निर्देश देण्यात आले.‎ बैठकीत ग्रामीण कौशल्य योजना,‎ स्वच्छ भारत अभियान, ग्रामीण‎ ज्योती योजना, अंत्योदय योजना,‎ पीक विमा योजना, आरोग्य‎ अभियान, कौशल्य विकास योजना‎ आदी विविध विषयांवर चर्चा झाली.‎

बातम्या आणखी आहेत...