आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानळाला पाणी नसल्यामुळे शहरवासीयांचे चार दिवस हाल झाले. या कालावधीत मनपाने त्यांच्याकडे असलेल्या पाचही टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले. शहरात चार दिवस पाण्याविना राहण्याची स्थिती प्रथमच आली. भविष्यात जर अशी स्थिती निर्माण झाली तर पाण्याविना नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून मनपा आणखी पाच थ्री इन वन टँकर खरेदी करणार आहे. शहरवासीयांना नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही तर मग किमान टँकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची होती. असे असतानाही मनपाकडे असलेल्या ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला. परिस्थितीचे गांभीर्य बघता मनपा आयुक्त डाॅ. आष्टीकर यांनी तसे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.