आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके धोक्यात:बदलत्या वातावरणामुळे 3 लाख‎ 14 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीपातील एक लाखापेक्षा अधिक‎ हेक्टरवरील पिकांना यंदा फटका‎ बसला असतानाच धुके पडणे, थंडगार‎ वारा सुटणे, गरम होणे अशा विविध‎ कारणांमुळे यंदाचे रब्बी पिके‎ अडचणीत येण्याची शक्यता आहे. गहु‎ पिकांना अडचण येत असताना हरभरा‎ पिकांवरही घाटेअळीचा प्रादुर्भाव‎ जाणवू लागला आहे. जिल्ह्यात रब्बीचा‎ पेरा तीन लाख १४ हजार ९४८ हेक्टर‎ क्षेत्रावर झाला असून यामध्ये‎ हरभऱ्याचा पेरा दोन लाख २४ हजार २०‎ हेक्टरवर करण्यात आला आहे.‎ जिल्ह्यामध्ये हवामानातील‎ बदलामुळे हरभरा पिकावर घाटे‎ अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.‎

हरभऱ्याचे पीक सध्या हे काही ठिकाणी‎ वाढीच्या तर काही ठिकाणी फुलोरा‎ अवस्थेत आहे. यादरम्यान घाटे‎ अळीच्या प्रादुर्भाव झाला आहे. घाटे‎ अळी ही हरभरा पिकाची प्रमुख किड‎ असून या किडीची मादी पतंग पानावर,‎ कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर आणि‎ फुलावर एकेरी अंडी घालत आहे. ही‎ अंडी खसखशीच्या दाण्यासारखी‎ दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी‎ बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत‎ द्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम‎ पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात‎ आणि गळून पडतात. थोड्या मोठ्या‎ झालेल्या अळ्या संपूर्ण पाने आणि‎ कोवळी देठे खाऊन फस्त करतात.‎

त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच‎ वन्य प्राण्यांचे संकट बळावले‎ माकडांचाही उच्छाद सुरु झाला आहे. ते सुध्दा‎ दाणे भरलेले हरबरे खाऊन पीक नष्ट करत‎ आहेत. वन्य प्राण्यांचाही हैदोस वाढला आहे.‎ रोही, हरीण यांचे कळप येऊन रब्बीचे पीक‎ उद्ध्वस्त करत आहे. त्याचा कोठे अहवाल घेतला‎ जात नाही. या प्राण्यांना इजाही पोहोचवले जात‎ नाही. कारण त्यासाठी कायदे आडवे येतात. परंतु,‎ शेतकऱ्यांनी पिकांवर होणारे अळयांचा प्रादुर्भाव‎ लक्षात घ्यावा की, वन्य प्राण्यांपासून पिकांचे‎ संरक्षण करावे हा प्रश्नच आहे. अळयांपासून‎ संरक्षण एकदा करण्यासाठी उपाययोजना होऊ‎ शकते. पण वन्य प्राण्यांचे काय.‎ - बाबुराव नरोटे, शेतकरी संघटना‎

शिल्लक राहतात. पुढे पिक‎ फुलोऱ्यावर आल्यावर या अळीचा‎ प्रादुर्भाव वाढतो आणि अळ्या‎ प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान‎ करतात. मोठ्या झालेल्या अळ्या‎ घाट्याला छिद्र करून आतील दाणे‎ खाऊन घाटे पोखरतात. एक अळी‎ साधारणतः ३० ते ४० घाट्यांचे‎ नुकसान करत आहे.‎

पक्षी आणू शकतात घाटे अळी नियंत्रणात‎ या रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करताना घाटे अळीचे परभक्षक‎ बगळे, मैना, राघो, नीळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून‎ घाटे अळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. तर अवाजवी‎ कीटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी कीटकनाशकांच्या वासामुळे‎ शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे कीटकनाशकांचा जास्त वापर‎ टाळावा.

ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून‎ उपयोग केला नसेल, त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती‎ हेक्टर २० पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे‎ अळ्या वेचण्याचे काम सोपे होते. घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी‎ पहिली फवारणी ५० टक्के फुलोऱ्यावर असताना करावी. निंबोळी अर्क‎ ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही (१७१०९ पीओबी/मिली) ५०० एलई प्रती‎ हेक्टर किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी, २० मिली फवारणी करावी. असे‎ कृषी विभागाचे म्हणणे आहे.‎

जिल्ह्यातील हरभरा लागवड‎
लोणार १७९८०‎ खामगाव १५२१२‎ शेगाव १६०४७‎ मलकापूर ५३७८‎ मोताळा ५५६३‎ नांदुरा ४३४१‎ जळगाव जा ५४१३संग्रामपूर ७५८७‎ चिखली ४२९६०‎ बुलडाणा ४१३७८‎ देऊळगाव राजा ३३९‎ मेहकर ३८६५५‎ सिंदखेड राजा १६१७०‎

बातम्या आणखी आहेत...