आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादर्यापूर तालुक्यातील शिवरखेडा गावात शरद सोळंके यांच्या शेतातील ३० ते ४० फुट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला अमरावती येथून गेलेल्या वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने सुमारे दीड तास प्रयत्न करून मंगळवार ३ रोजी बाहेर काढले. यामुळे या वन्य प्राण्याला जीवदान मिळाले आहे. विहिरीत दोर आणि लहान पिंजरा सोडून या कोल्ह्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवास जंगलात सोडण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला, सहायक वनसंरक्षक अमरावती ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात अमोल गावनेर यांच्या नेतृत्त्वातील वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केली.हे रेस्क्यू पथक सातत्याने वन्य प्राण्यांच्या रक्षणार्थ सज्ज असते. या पथकाने गेल्या काही महिन्यांत नीलगायी, साप, कोल्हे, हरिण अशा विविध प्राण्यांची सुरक्षित सुटका करून त्यांना जंगलात सोडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.