आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर काँग्रेसच्या वतीने शहरातील रहाटगाव परिसरातून ‘हात से हात जोडो’ अभियानाला १४ मार्चला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. घराेघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. तसेच त्यांना पत्रकही देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर अ. भा. काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार अमरावती शहरात व जिल्ह्यात ‘हात से हात जोडो’ अभियानाला माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलींद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश चिटणीस आसिफ तवक्कल, महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. अंजली ठाकरे, युवक काँग्रेस जिल्हा नीलेश गुहे, वैभव देशमुख, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, एनएसयूआय शहराध्यक्ष संकेत साहू, रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. रहाटगाव परिसर येथे ‘हात से हात जोडो’ अभियानाचे उत्तम आयोजन माजी नगरसेवक गोपाल धर्माळे, माजी नगरसेवक विजय वानखडे, काँग्रेस सरचिटणीस मुकेश गिरी, दीपक लोखंडे, किरण मेहरे, अरुण रामेकर यांनी केले.
सकाळी ९ वाजता मुख्य चौक रहाटगाव येथून अभियानास सुरुवात झाली. सर्वप्रथम बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. रहाटगाव परिसरात काँग्रेसच्या या अभियानास प्रामुख्याने माजी नगरसेवक बाळासाहेब भुयार, अशोक डोंगरे, संजय वाघ, भैयासाहेब निचळ, प्रा. बी. टी. अंभोरे, बाळासाहेब घोंगडे, सलीम बेग, शोभा शिंदे, जयश्री वानखडे, देवयानी कुर्वे, मैथिली पाटील, कांचन खोडके, शिल्पा राऊत, शीतल देशमुख, अंजली उघडे, दिलीप शेटे, सचिन निकम, प्रा. अनिल देशमुख, दिनेश खोडके, देवेंद्र पोहोकार, किशोर रायबोले, सचिन निकम, नितीन काळे, विजय खंडारे, अरुण बनारासे, डॉ. डी. एस. नवाळे, मधुकर गवई, शाम देशमुख, वानखडे, देवानंद गुडधे, दादाराव गुढधे, रवींद्र शिरसाठ, सौरभ शेंडे, प्रतीक सावळे, दिलीप चव्हाण, अशोक सुखदेवे, शंकर अढळसे, प्रवीण राऊत, प्रा. अरुण राऊत यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
विविध घोषणांसह अभियान नागरिकांपुढे भाजपच्या नाकर्तेपणाची यादीच मांडण्यात आली. विस्तृत पत्रक यावेळी परिसरातील सर्व नागरिकांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद’, ‘नफरत छोडो भारत जोडो’ या घोषणांनी संपूर्ण रहाटगाव परिसर दुमदुमला होता. काँग्रेसच्या या ‘हात से हात जोडो’ अभियानाला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. महागाई व बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांमुळे नागरिकांमधी आक्रोश या निमित्ताने प्रतिबिंबित होत आहे. भाजपच्या एकंदरीत अाचरणाबद्दल समाजातील प्रत्येक घटकात असलेली नाराजी जाहीररीत्या नागरिकांनी या निमित्ताने व्यक्त केली.
स्नेहभाव, सद्भावाचा संदेश पदभ्रमण करत अभियानांतर्गत परिसरातील नागरिकांसोबत सत्ताधारी पक्षातर्फे देशात निर्माण करण्यात येत असलेली महागाई, बेरोजगारी,जातिवाद या बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे देशात निर्माण करण्यात येत असलेल्या स्नेहभाव व सद्भवाचासंदेश देत प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पूर्ण केलेल्या अभूतपूर्व भारत जोडो यात्रे दरम्यान प्रसारित केलेला संदेश प्रत्यक्ष परिसरातील नागरिकांपर्यंत पोहाेचवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.