आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिनगावराजा दरात शेवटच्या टप्प्यात वाढ होईल या अपेक्षेने साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले आहे. कापसाला मिळत असलेला निचांकी दर पाहता या शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’ कवडीमोल ठरत असल्याचा अनुभव त्यांना येत आहे.
कापूस हे नगदी पीक आहे. मात्र, उत्पादन खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि त्यातच लक्षणीय प्रमाणात घसरलेले भाव यामुळे शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामातील कापूस घरातच साठवून ठेवला. आज नाही तर उद्या भाव वाढतील या आशेने कापसाची साठवणूक केली.
मात्र, कापसाचे भाव काही वाढले नाहीत. कापूस दरात शेवटच्या टप्प्यात वाढ होईल, अशी अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे भाववाढीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. सद्य:स्थितीत कापसाचे दर नीचांकी पातळीवर असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हंगामाच्या सुरुवातीस नोव्हेंबर महिन्यात खासगी विक्रीत कापसाला उच्चांकी ९ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर दरात सातत्याने चढ-उतार होत होता.
मागील पाच महिन्यांत कापसाचे दर ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल राहिले. शेतकऱ्यांना किमान शेवटच्या टप्प्यात तरी कापूस दरात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, हंगाम संपत आला तरी कापूस दरात सुधारणा झाली नाही. दरवाढीच्या दृष्टीने शासनाने गांभीर्य दाखवले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला मिळालेले सरासरी दर कायम राहिले. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी, दि. २२ मे रोजी कापसाला सरासरी ७ हजार ६५० रुपये प्रतििक्वंटल याप्रमाणे भाव मिळाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.