आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी २८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले असून संचालकांच्या १८ पदांसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष असे की तब्बल ५६ अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले. त्यापूर्वीच्या काही दिवसांत केवळ एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. एकूण उमेदवारी अर्जांमध्ये एकट्या सेवा सहकारी मतदार संघासाठीचे ३५ अर्ज आहेत. याशिवाय ग्रामपंचायत मतदार संघातून १६ अर्ज, व्यापारी-अडते मतदारसंघासाठी ४ अर्ज तर हमाल-मापारी मतदारसंघासाठी २ अर्ज दाखल करण्यात आले आहे.
माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांचा गृह तालुका असलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यत एकूण ६४ अर्जाची उचल करण्यात आली होती. सेवा सहकारी मतदार संघातून ११ प्रतिनिधी निवडणूक द्यावयाचे आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून ७, महिला राखीवमधून २, इतर मागासवर्गीयांमधून १, विमुक्त जाती-भटक्या जमातीमधून १ अशाप्रकारे ११ प्रतिनिधींसाठी ३५ अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातून ४ प्रतिनिधींची निवड करावयाची आहे. यामध्ये सर्वसाधारण मधून २ प्रतिनिधी निवडायचे असून अनुसूचित जाती-जमाती या संवर्गासह आर्थिक दुर्बल घटकातून प्रत्येकी एक संचालक निवडावा लागेल. त्यासाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत. अडते व व्यापारी मतदार संघातील दोन प्रतिनिधींसाठी ४ अर्ज प्राप्त झाले असून हमाल व मापारी मतदार संघाच्या एका प्रतिनिधीसाठी २ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीकडे तिवसा तालुक्यासह परिसरातील नागिरकांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.