आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजल जीवन मिशन अंतर्गत कार्यान्वित पाणीपुरवठा योजनेत आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची व्यवस्था करण्यात आली असून जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्तरावर ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात गावांमध्येही शुद्ध पाणी पुरवठा होऊन, जलजन्य आजार कमी होणार आहेत. महानगर, शहरे, गावांमध्ये पाण्याच्या टाक्यांद्वारे पिण्याचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते. हे पाणी आधी धरणे, नहर, नदी, नाल्यांमधून घेतले जाते.
इलेक्ट्रोक्लोरिफिकेशन पाणी शुद्ध करणारी यंत्रणा इलेक्ट्रोक्लोरिनेशन पद्धत आतापर्यंत ग्रामपंचायतींचे कर्मचारी गावोगावी जाऊन पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी त्यात क्लोरिन पावडर टाकायचे. आता हे काम इलेक्ट्रोक्लोरिनेशनद्वारे होणार आहे. या प्रक्रियेत क्लोरिन वायू थेट पाण्यात सोडला जाईल. त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पाण्याची शुद्धता वाढणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.