आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:अंजनगाव बारीचे अतिक्रमण‎ धारक थेट जिल्हा कचेरीवर‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंजनगाव बारी येथील बजरंग‎ नगर ही वस्ती नियमानुकूल‎ करण्यात यावी, या मागणीसाठी‎ शुक्रवारी महिला मुक्ती मोर्चाच्या‎ नेतृत्वात नागरिकांनी जिल्हा‎ कचेरीवर धाव घेतली आहे.‎ यावेळी आपल्या मागणीचे निवेदन‎ जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.‎ अंजनगाव बारी येथील बजरंग‎ नगर ही वस्ती मागील २००५ पासून‎ वसलेली आहे. या घरांना‎ ग्रामपंचायत अंजनगाव बारी यांनी‎ घर टॅक्स आकारणी केलेली असून‎ या वस्तीत इलेक्ट्रिक विज, नळ‎ योजना अशा शासनाच्या अनेक‎ सुविधा आलेल्या आहेत. बजरंग‎ नगर येथील रहिवासी नागरिकांची‎ नावे समाविष्ट आहेत.

अनेक‎ सुविधा उपलब्ध असून‎ ग्रामपंचायत अंजनगाव घरकुल‎ यादीमध्ये बारी हे हेतुपुरस्सर‎ शासनाच्या घरकुल यादीत नावे‎ असतानाही डावलण्याचे प्रयत्न‎ करीत आहे. या जागेवर घरकुल‎ देण्यास ग्रामपंचायत कार्यालय‎ टाळाटाळ करीत आहे. शासनाच्या‎ घरकुल योजनेपासून वंचित‎ ठेवण्याचा प्रयत्न करीत‎ असल्याचा आरोप महिला मुक्ती‎ मोर्चाने केला. आहे. बजरंग नगर‎ या वस्तीला नियमानुकूल करणे‎ अत्यंत गरजेचे आहे. २०११च्या‎ शासन निर्णयानुसार नियमानुकूल‎ करण्यात यावे, अशी मागणी‎ महिला मुक्ती मोर्चाच्या वतीने‎ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून‎ केली आहे. यावेळी अशोक‎ खरात, संगीता वाघ, विनोद‎ गुलदेवकर, रवींद्र इंगळे, किशोर‎ गेडाम, सविता नेवारे, वनिता‎ अजबे, ललिता तायवाडे, पंकज‎ डोनारकर, भीमराव कांबळे,‎ रामचंद्र भोंगरे, शाम वाघमारे आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...