आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेंदुरजनाघाट वरुड ते रोशनखेडा जुना पाणंद रस्ता रेल्वेनी ताब्यात घेतल्यामुळे वरुड शहरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. दरम्यान, रेल्वे स्टेशनच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरूम उचलला असून त्याची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी खासदार रामदास तडस, डॉ. अनिल बोंडेंकडे केली. काही शेतकऱ्यांची शेती ही रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे. वंश परंपरागत पद्धतीने वरुड शहरातून शेतकरी वरुड-रोशनखेडा या जुन्या पाणंद रस्त्याने शेतामध्ये जात होते, परंतु रेल्वेची निर्मिती झाल्यापासून हा पाणंद रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे.
सध्याच्या परिस्थितीत शेतकरी रेल्वे रुळाच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जात आहेत, परंतु काही दिवसांपूर्वी या मार्गावर जीवघेणे खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसून शेतमाल काढण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाने मोका पाहणी करून सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी तोडगा काढून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचण होणार नाही, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास सामूहिक आत्महत्येचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.