आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाफेड’चे केंद्र सुरू होण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष‎:दर्यापूर तालुक्यामध्ये‎ हरभरा काढणीला वेग‎

दर्यापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात मागील पंधरवड्यापासून‎ हरभरा काढणीला चांगलाच वेग‎ आला आहे. दर्यापूर कृषी उत्पन्न‎ बाजार समितीत हरभऱ्याला ४ हजार‎ ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत‎ आहे. यावर्षी हरभरा पिकावर‎ रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने‎ हरभऱ्याच्या उताऱ्यात मोठी घट येत‎ असल्याचे शेतकरी सांगत आहेत.‎ दर्यापूर तालुक्यामध्ये गतवर्षी‎ मुसळधार पाऊस व परतीच्या‎ पावसामुळे जलसाठ्यात वाढ‎ झाली. त्यामुळे हरभऱ्याच्या पीक‎ पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली‎ होती.‎ तालुक्यात १५ हजार ७०९‎ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी‎ झाली असल्याचे तालुका कृषी‎ अधिकारी राजकुमार अडगोकार‎ यांनी सांगितले.

यावर्षी हरभरा‎ पिकावर रोगराई व हिवाळ्यातील‎ धुआरीमुळे हरभऱ्याच्या‎ उत्पादनामध्ये मोठी घट येत‎ असल्याचे दिसून येत आहे. तसेच‎ शासकीय हमीभावाच्या तुलनेत‎ सद्यस्थितीत खुल्या बाजारात दरात‎ देखील मोठी तफावत आहे.‎ प्रत्यक्षात मार्चं महीना सुरू होऊनही‎ ‘नाफेड’ची खरेदी केंद्रे सुरू झाली‎ नसल्याने पैशाची गरज व‎ देणी-घेणी असल्याने शेतकऱ्यांना‎ व्यापाऱ्यांना कमी दरात हरभरा‎ विकावा लागत आहे. त्यामुळे‎ प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांचे‎ नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.‎ शासकीय नाफेडची खरेदी केव्हा‎ सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे‎ लक्ष लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...