आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मागण्यांसाठी शेकडो ऑटोचालक‎ ऑटोंसह धडकले जिल्हाकचेरीवर‎ ; मानधन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने महिलांसाठी एसटीच्या‎ प्रवास तिकिटामध्ये ५० टक्के सूट दिली‎ आहे, तर वयोवृद्धांसाठी मोफत प्रवास‎ केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील‎ ऑटोचालकांच्या कुटुंबावर‎ उपासमारीची वेळ आल्याचा आरोप‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला‎ आहे. त्यामुळे सरकारच्या या‎ निर्णयाविरोधात मंगळवारी डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) ते‎ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎ काढण्यात आला. या मोर्चातून ऑटो‎ चालक व मालकांना दरमहा नऊ हजार‎ रुपये मानधन देण्याची मागणी‎ निवेदनातून केली. मागणी पूर्ण न‎‎‎‎‎‎‎‎ झाल्यास ऑटोसह आत्मदहनाचा इशारा‎ कपिल पडघान यांनी दिला.‎ राज्य शासनाने महिलांकरिता एसटी‎ बसमध्ये ५० टक्के तिकीट सुट दिलेली‎ आहे.

तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ‎ नागरिकांना सुद्धा पूर्णपणे मोफत प्रवास‎ करण्याची मुभा देण्यात आली आहे.‎ अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील‎ ऑटोचालक-मालकांसह त्यांच्या‎ कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.‎‎‎‎‎‎‎‎ सोबतच ऑटो चालकांच्या मुलांचे‎ शैक्षणिक भवितव्य अंधारात येण्याची‎ परिस्थिती निर्माण झाली आहे.‎ ऑटोचालक-मालक हे बेरोजगार असून,‎ त्यांना दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन‎ नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‎ म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ‎ नागरिक, महिलांकरिता एसटी बसमध्ये‎ तिकिटाची सुट दिलेली आहे.

त्यामुळे‎ ऑटोचालकांचे व्यवसाय पूर्णतः‎ संपण्याच्या मार्गावर आलेला आहे.‎ त्यामुळे शासनाने ऑटोचालक -‎ मालकांना प्रती महिना ९ हजार मानधन‎ देण्यात यावे. दहा दिवसात निराकरण न‎ झाल्यास तीव्र आंदोलन करणार‎ असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदनातून दिला आहे.‎ या मोर्चामध्ये कपिल पडघान, सय्यद‎ फारुख सय्यद चांद, प्रमोद आष्टीकर,‎ प्रफुल बिसने, शेख वाजीद शेख जमाल,‎ रुपेश यादव, इकबाल अहमद अमीर‎ अहमद, राजू सोळंके, शेख जाफर शेख‎ हुसेन, विजय यादव, अमोल घाटे,‎ प्रतीक राऊत, ज्ञानेश्वर खोब्रागडे, दीपक‎ शिंगाडे, मधुकर मोरे, सलीम कुरेशी,‎ अविनाश आमले यांच्यासह मोठ्या‎ संख्येने ऑटो चालक सहभागी होते.‎

जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑटो चालकांनी काढलेला मोर्चा. दुसऱ्या छायाचित्रात मोर्चात सहभागी रिक्षाचालकांना संबोधित करताना संघटनेचे पदाधिकारी.‎ मागण्या मान्य करा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा‎ राज्य शासनाने ऑटोचालकांच्या मागणीची दहा दिवसात दखल न घेतल्यास‎ जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑटोसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा‎ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कपिल पडघान यांनी दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील‎ शेकडो ऑटो चालक सहभागी होणार असल्याचेही पडघान यांनी सांगितले.‎