आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:विद्यार्थ्यांत दुर्दम्य इच्छाशक्ती असेल,‎ तर भविष्यातील आव्हाने पेलणे शक्य‎

अमरावती6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण‎ घेत असताना अनेक अडथळ्यांना‎ पार करत, मोहाच्या क्षणांना बळी न‎ पडता, आयुष्याचा आनंद लुटत‎ गांभीर्याने शिकले पाहिजे. येणाऱ्या‎ संकटांचा सामना केला पाहिजे.‎ आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव‎ सदैव ठेवली पाहिजे. इमानदारीने‎ मेहनत करून आपले ध्येय गाठले‎ पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये दुर्दम्य‎ इच्छाशक्ती असेल, तरच‎ भविष्यातील आव्हाने पेलता येतील.‎ आपल्या सभोवतीचे जग हे‎ आपल्याला ओरबडायला निघाले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.

सदैव डोळे उघडे ठेवून‎ जगाकडे बघायला पाहिजे. जगाकडे‎ बघण्याचा दृष्टीकोन शिक्षणातून,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाचनातून विकसित होतो.‎ वाचनातून व अनुभवातून‎ सभोवताल समजून घेतला पाहिजे,‎ असे प्रतिपादन प्रा. चक्रधर कोठी‎ यांनी केले. श्रीमती नरसम्मा कला,‎ वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील मराठी‎ विभागातर्फे आयोजित मराठी भाषा‎ व वाङ््मय मंडळाच्या उद््घाटनाच्या‎ कार्यक्रमांमध्ये मुख्य मार्गदर्शक‎ म्हणून बोलत होते.‎ प्रा. चक्रधर कोठी पुढे असे‎ म्हणाले, आठशे वर्षांपूर्वी सर्वज्ञ‎ श्री चक्रधर स्वामींनी मराठी‎ भाषेला ज्ञानभाषेचा धर्म भाषेचा‎ दर्जा दिला.

महाराष्ट्र प्रदेशाबद्दल‎ आदर व अभिमान बाळगला.‎ विदर्भातील रिद्धपूर येथे श्री‎ चक्रधरांच्या प्रेरणेतूनच महानुभाव‎ वाङ््मयाची विपुल निर्मिती झाली.‎ महानुभाव लेखकांनी अनेक‎ साहित्य प्रकार हाताळून मराठी‎ भाषेचे ग्रंथदालन समृद्ध केले.‎ कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश‎ चंदनपाट उपस्थित होते. त्यांनी‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी‎ विभाग प्रमुख डॉ. अण्णा वैद्य‎ यांनी मराठी भाषा व वाङ््मय‎ मंचाद्वारे वर्षभर राबवण्यात‎ आलेल्या कार्यक्रमाची माहिती‎ दिली. नव नियुक्त मराठी भाषा व‎ वाङ््मय मंडळ अध्यक्ष म्हणून‎ प्राची ब्राह्मणे हिचे बुके देऊन‎ प्राचार्यांच्या हस्ते स्वागत करण्यात‎ आले. कार्यक्रमाला इतिहास‎ विभागप्रमुख डॉ. राठोड व इतर‎ प्राध्यापक मंडळी तसेच कला‎ शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने‎ उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन वैष्णवी चिलुलकर,‎ तर आभार डॉ. पंकज वानखेडे‎ यांनी केले.‎

स्पर्धेतील विजेत्यांना केले सन्मानित‎
हस्ताक्षर स्पर्धेत जान्हवी पाटील, साक्षी चौधरी, प्रिया कुरील, वैष्णवी‎ चिलुरकर तसेच मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात‎ आलेल्या मराठी भाषा सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी धनश्री सावरकर, चेतन‎ ताथोड या विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...