आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआश्रम पत्रकार हा समाजातील महत्त्वपूर्ण घटक आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न व समस्या तो आपल्या लेखणीद्वारे मांडत असतो. तसेच शासनाच्या विविध योजना समाजापर्यंत पोहोचवत असतो. सर्वसामान्यांना न्याय देताना पत्रकारांनी आपली लेखणी सतत तळपत ठेवावी, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी केले.
विवेकानंद आश्रमाच्या वतीने आज, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोरहाते बोलत होते. विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी यावेळी विधायक पत्रकारितेचे महत्त्व सांगताना पत्रकारांसमोरील अडचणींचा लेखाजोखा सादर केला. कार्यक्रमात आश्रमाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार मधू आढाव, समाधान म्हस्के, शिवप्रसाद थुट्टे, सदाशिव काळे व गंगाधर निकस यांच्यासह अनेक मान्यवर व आश्रमातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.