आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातील प्रवेशाकरिता जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून, शासनाच्या आदेशानुसार याकरिता ३ फेब्रुवारीपर्यंत शाळांची नोंदणी करणे गरजेचे होते. मात्र, या नोंदणीला शहरातील शाळांचा ‘नो रिस्पॉन्स’ असल्याचे दिसून आले. या ९ दिवसांत २४२ शाळांपैकी केवळ शंभर शाळांचीच नोंदणी झाली आहे.
त्यामुळे शाळा नोंदणीला शिक्षण विभागाकडून १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दि ली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते. त्यानुसार वर्ष २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत काढून राज्यात ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी आरटीई पोर्टलवर जाहीर केली होती. मागील वर्षी जिल्ह्यात ३२३ पैकी २४० शाळांची नोंदणी झाली होती.
तर २ हजार २३९ पाल्यांकरिता जागा रिक्त दाखवण्यात आल्या होत्या. परंतु प्रवेशाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत यातील काही जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा शासनाकडून १०० टक्के प्रवेश करण्यासाठी लवकर सुरुवात करण्यात आली आहे. वर्ष २०२३-२४ साठी प्रक्रिया सुरू करीत पहील्या टप्प्यात शाळांची नोंदणी हाती घेण्यात आली आहे. ही नोंदणी २३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान करायची होती. परंतु ३ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २४२ शाळांपैकी शंभर शाळांचीच नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जोपर्यंत शाळा नोंदणीचा टप्पा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवणे अशक्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.